शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या खूनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 3, 2016 03:47 IST

खालुंब्रे येथील दीड महिन्याच्या बाळाचा विहिरीत फेकून खून केल्याप्रकरणी फिर्यादीच खुनी असल्याचे अखेर निष्पन्न झाले. चाकण पोलीस ठाण्यात बाळाच्या आईवर खुनाचा गुन्हा दाखल

चाकण : खालुंब्रे येथील दीड महिन्याच्या बाळाचा विहिरीत फेकून खून केल्याप्रकरणी फिर्यादीच खुनी असल्याचे अखेर निष्पन्न झाले. चाकण पोलीस ठाण्यात बाळाच्या आईवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. या घटनेचे सर्वप्रथम वृत्त देऊन या घटनेचा पहिल्या दिवसापासून ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. या प्रकरणी मृत बाळाची आई अश्विनी अजित बोत्रे (वय २०) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २१ जून २०१६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास भावकीच्या जमिनीच्या वादातून दीड महिन्याच्या मुलाला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना खालुंब्रे (ता. खेड) येथे वाघेश्वर वस्तीवर घडली. या घटनेत दर्शन अजित ऊर्फ राजू बोत्रे या चिमुकल्याचा बडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी अजितचा चुलतभाऊ शिवाजी नामदेव बोत्रे ( वय ३५, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) यास अटक करण्यात आली. त्यानंतर २३ जून रोजी खुनाची खोटी फिर्याद दिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात बैठक घेतली. ‘लोकमत’ने या घटनेचा पहिल्या दिवसापासून पाठपुरावा केला. २४ जून रोजी ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळून या घटनेच्या निषेधार्थ गावात निषेध फेरी काढली व ग्रामस्थांनी हे प्रकरण खोटे असल्याने बाळाचे आई, वडील व आरोपीची नार्को टेस्टची मागणी केली. २८ जूनला आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली. २९ जूनला पोलिसांनी न्यायालयाकडे नार्को टेस्टची मागणी केली असता, न्यायालयाने नार्को टेस्ट करण्यास परवानगी दिली. नार्को टेस्टमुळे खरा प्रकार उघड होणार, या भीतीने फिर्यादीने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला. २ जुलै रोजी खेड न्यायालयासमोर फिर्यादी महिलेचा कबुली जबाब नोंदविला व चाकण पोलीस ठाण्यात फियार्दीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की खोटी फिर्याद दिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आंदोलन छेडले, याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला व नार्को टेस्टची मागणी करण्यात आल्यामुळे आपले पितळ उघडे पडणार, यामुळे फिर्यादीने आपण केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. पोलीस रिपोर्ट दिल्यानंतर ४ दिवसांनी शिवाजीची मुक्तता होणार आहे.