शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावरील माती जातेय वाहून; भविष्यात शहराला धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST

पुणे : भैरोबानाला पावसाळ्यात भरून वाहतो. दरवर्षी त्यात पावसाचे गढूळ पाणी येत असते. पण यंदा मात्र या नाल्यात लालसर ...

पुणे : भैरोबानाला पावसाळ्यात भरून वाहतो. दरवर्षी त्यात पावसाचे गढूळ पाणी येत असते. पण यंदा मात्र या नाल्यात लालसर किंवा तांबडे पाणी येत आहे. डोंगरातील माती वाहून जात असल्याने पाणी लाल दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुण्याभोवती चांदणी चौक, कात्रज परिसरातील डोंगर तोडले जात असल्याने पावसात तेथील लाल माती वाहून जात आहे. परिणामी हे डोंगर ठिसूळ होणार आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्यालाही पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या कोल्हापूर, चिपळूण, सांगलीमध्ये पुरामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्या ठिकाणी देखील सर्वत्र लाल मातीमिश्रित पाणीच दिसून येत आहे. याचाच अर्थ डोंगरावरील माती पावसाच्या पाण्याने वाहत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे बांधकामे, रस्त्यासाठी डोंगर फोडणे, प्लॉटिंगसाठी डोंगरांचा वापर आदी कारणांमुळे डोंगरावरील वृक्षदेखील कापली जात आहेत. झाडांची मुळे हाताच्या पंजाने पकडल्यासारखी जमीन घट्ट धरून ठेवतात. खोलवर जाणारी आणि पसरणारी मुळे असलेली झाडे पर्वतांच्या उतारावर लागतात. या उतारांवर अशा झाडांखेरीज इतर कोणतीही वनश्री माती धरून ठेवू शकत नाही. झाडे जवळ जवळ पाहिजेत. त्यामुळे जमिनीत त्यांची मुळे एकमेकांत गुंतली जातात. त्यांची जाळी बनते. काही झाडांची मुळे सरळ सोट खोलवर जाणारी, तर काहींची वरवर, पण व्यापक प्रमाणावर पसरणारी मुळे असावी लागतात. या रचनेमुळे माती घट्ट धरून ठेवली जाते. झाडांचे शेंडे एकमेकांवर येणारे आणि आच्छादन घालणारे असावेत. त्यामुळे सोसाट्याने येणारा पाऊस या शेंड्यांवर अडविला जाऊन, त्याचा वेग कमी होऊन पाणी हलकेच जमिनीवर पडते. साहजिकच माती जागच्या जागी घट्ट आणि पक्की राहते. जमिनीच्या संरक्षणाबरोबरच झाडांचे चांगले आच्छादन जमिनीखालचे पाणी वाढविण्यास मदत होते. पाणी जर डोंगरावरून वाहून गेले तर जमिनीखाली साठणार नाही. जमिनीवरचा पालापाचोळा प्रवाहाला विरोध करतो. ते जमिनीत जिरते.

—————————————

स्वच्छ पाणी असेल तर सर्व छान

डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यांमधले पाणी गढूळ असते. याचाच अर्थ तेथील माती वाहून जातेय. ते पाणी जर स्वच्छ असेल तरच तेथील माती घट्ट चिकटून बसलेली आहे आणि एकूण परिस्थिती चांगली आहे असे समजते. पण पाणी गढूळ असेल तर वरवरचे हिरवे आच्छादन काहीच उपयोगाचे नसते.

——————————————-

डोंगरफोड केल्याने तेथील लाल माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून नदी, नाल्यात जाते. परिणामी त्यातील पाणी लालसर दिसून येते. डोंगरफोड करणे अतिशय धोकादायक आहे.

- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ

————————————-