शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

डोंगरावरील माती जातेय वाहून; भविष्यात शहराला धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST

पुणे : भैरोबानाला पावसाळ्यात भरून वाहतो. दरवर्षी त्यात पावसाचे गढूळ पाणी येत असते. पण यंदा मात्र या नाल्यात लालसर ...

पुणे : भैरोबानाला पावसाळ्यात भरून वाहतो. दरवर्षी त्यात पावसाचे गढूळ पाणी येत असते. पण यंदा मात्र या नाल्यात लालसर किंवा तांबडे पाणी येत आहे. डोंगरातील माती वाहून जात असल्याने पाणी लाल दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुण्याभोवती चांदणी चौक, कात्रज परिसरातील डोंगर तोडले जात असल्याने पावसात तेथील लाल माती वाहून जात आहे. परिणामी हे डोंगर ठिसूळ होणार आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्यालाही पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या कोल्हापूर, चिपळूण, सांगलीमध्ये पुरामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्या ठिकाणी देखील सर्वत्र लाल मातीमिश्रित पाणीच दिसून येत आहे. याचाच अर्थ डोंगरावरील माती पावसाच्या पाण्याने वाहत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे बांधकामे, रस्त्यासाठी डोंगर फोडणे, प्लॉटिंगसाठी डोंगरांचा वापर आदी कारणांमुळे डोंगरावरील वृक्षदेखील कापली जात आहेत. झाडांची मुळे हाताच्या पंजाने पकडल्यासारखी जमीन घट्ट धरून ठेवतात. खोलवर जाणारी आणि पसरणारी मुळे असलेली झाडे पर्वतांच्या उतारावर लागतात. या उतारांवर अशा झाडांखेरीज इतर कोणतीही वनश्री माती धरून ठेवू शकत नाही. झाडे जवळ जवळ पाहिजेत. त्यामुळे जमिनीत त्यांची मुळे एकमेकांत गुंतली जातात. त्यांची जाळी बनते. काही झाडांची मुळे सरळ सोट खोलवर जाणारी, तर काहींची वरवर, पण व्यापक प्रमाणावर पसरणारी मुळे असावी लागतात. या रचनेमुळे माती घट्ट धरून ठेवली जाते. झाडांचे शेंडे एकमेकांवर येणारे आणि आच्छादन घालणारे असावेत. त्यामुळे सोसाट्याने येणारा पाऊस या शेंड्यांवर अडविला जाऊन, त्याचा वेग कमी होऊन पाणी हलकेच जमिनीवर पडते. साहजिकच माती जागच्या जागी घट्ट आणि पक्की राहते. जमिनीच्या संरक्षणाबरोबरच झाडांचे चांगले आच्छादन जमिनीखालचे पाणी वाढविण्यास मदत होते. पाणी जर डोंगरावरून वाहून गेले तर जमिनीखाली साठणार नाही. जमिनीवरचा पालापाचोळा प्रवाहाला विरोध करतो. ते जमिनीत जिरते.

—————————————

स्वच्छ पाणी असेल तर सर्व छान

डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यांमधले पाणी गढूळ असते. याचाच अर्थ तेथील माती वाहून जातेय. ते पाणी जर स्वच्छ असेल तरच तेथील माती घट्ट चिकटून बसलेली आहे आणि एकूण परिस्थिती चांगली आहे असे समजते. पण पाणी गढूळ असेल तर वरवरचे हिरवे आच्छादन काहीच उपयोगाचे नसते.

——————————————-

डोंगरफोड केल्याने तेथील लाल माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून नदी, नाल्यात जाते. परिणामी त्यातील पाणी लालसर दिसून येते. डोंगरफोड करणे अतिशय धोकादायक आहे.

- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ

————————————-