शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित हवामानामुळे कांदापिकावर करपा

By admin | Updated: January 22, 2016 01:33 IST

परिसरात सध्या कांद्याच्या पिकावर हवामानात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरात सध्या कांद्याच्या पिकावर हवामानात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मोठ्या पैशाच्या अपेक्षेने केलेल्या कांदापिकाचे वांदे होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. सध्या काही प्रमाणात थंडी वाढू लागली आहे. थंडीमुळे दव किंवा धुके यांच्या प्रमाणात वाढ होत असून, कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे कांद्याच्या पातीवर (पानांवर) पांढरे चट्टे पडू लागले आहेत. दिवाळीदरम्यान लागवड झालेले कांदापीक सध्या काढणीला आलेले आहे. ज्याची काढणी १0 ते १५ दिवसांत होणार आहे त्या कांदापिकावर दव किंवा धुक्याचा फारसा परिणाम होणार नाही. परंतु ज्या कांदापिकाच्या काढणीला एक ते दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असेल, त्यांनी दव किंवा धुक्यापासून पिकाचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबाबत राजेगाव येथील कृषी सहायक शरद काळे म्हणाले की, धुके किंवा दव अशी स्थिती असल्यास कांदापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहे. धुके किंवा थंडीपासून कांदापिकाला वाचवण्यासाठी ज्यांच्याकडे तुषार सिंचन उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी सकाळी पाच ते दहा मिनिटे यंत्रणा चालवावी. दव धुऊन गेल्याने नुकसानीचे प्रमाण कमी होते. ज्यांच्याकडे तुषार सिंचन यंत्रणा नाही त्यांनी फवारणी पंपाने फवारणी करून घ्यावी.