शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कॅन्सर उपचार केंद्र दहा जिल्ह्यांत उभारणार : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील कॅन्सर रुग्णांना ...

लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते.

ते म्हणाले की, राज्यातील कॅन्सर रुग्णांना किमो, रेडिएशन थेरपीसाठी प्रतीक्षा करावे लागते. गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयातील उपचारांशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कॅन्सरवरील उपचार करण्यासाठी सुविधा नाहीत, अशा ठिकाणी प्रत्येकी २० कोटी खर्च करून कॅन्सर उपचार केंद्र सुरू केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता नाही. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असणारा निधी कॅन्सर उपचार केंद्रासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.

टोपे म्हणाले की, राज्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत अधिकाधिक रुग्णालय सुरू व्हावेत, असे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. तसेच राज्यातील अर्धवट प्रस्तावित असणाऱ्या शासकीय रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी परदेशातून कर्ज मिळविण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील आरोग्य विभागाच्या 17 हजार जागा भरण्याबाबत प्रक्रिया राबविली जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व जागा भरण्याचा प्रयत्न आहे. तसेच, कोरोनाकाळात सेवा दिलेल्या डॉक्टरांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घेण्यासाठी भरतीसंदर्भातील कायद्यामध्ये आवश्यक बदल करावा लागणार आहे.

--------

...तर शाळा सुरू होतील

राज्यातील शाळा सुरू व्हाव्यात, यासंदर्भात राज्याच्या टास्क फोर्सने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतरच शाळा सुरू होतील, असेही टोपे यांनी सांगितले.