शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

कॅन्सर उपचार केंद्र दहा जिल्ह्यांत उभारणार : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील कॅन्सर रुग्णांना ...

लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते.

ते म्हणाले की, राज्यातील कॅन्सर रुग्णांना किमो, रेडिएशन थेरपीसाठी प्रतीक्षा करावे लागते. गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयातील उपचारांशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कॅन्सरवरील उपचार करण्यासाठी सुविधा नाहीत, अशा ठिकाणी प्रत्येकी २० कोटी खर्च करून कॅन्सर उपचार केंद्र सुरू केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता नाही. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असणारा निधी कॅन्सर उपचार केंद्रासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.

टोपे म्हणाले की, राज्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत अधिकाधिक रुग्णालय सुरू व्हावेत, असे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. तसेच राज्यातील अर्धवट प्रस्तावित असणाऱ्या शासकीय रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी परदेशातून कर्ज मिळविण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील आरोग्य विभागाच्या 17 हजार जागा भरण्याबाबत प्रक्रिया राबविली जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व जागा भरण्याचा प्रयत्न आहे. तसेच, कोरोनाकाळात सेवा दिलेल्या डॉक्टरांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घेण्यासाठी भरतीसंदर्भातील कायद्यामध्ये आवश्यक बदल करावा लागणार आहे.

--------

...तर शाळा सुरू होतील

राज्यातील शाळा सुरू व्हाव्यात, यासंदर्भात राज्याच्या टास्क फोर्सने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतरच शाळा सुरू होतील, असेही टोपे यांनी सांगितले.