शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

निविदा न काढताच सुरू केलेले काम अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:57 IST

कामाची निविदा न काढताच भवानी पेठ येथे सुरू करण्यात आलेले रस्त्यांचे काम अखेर रद्द करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशामुळे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी रोखली गेली

पुणे : कामाची निविदा न काढताच भवानी पेठ येथे सुरू करण्यात आलेले रस्त्यांचे काम अखेर रद्द करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशामुळे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी रोखली गेली खरी; पण आता खोदलेला रस्ता पूर्ववत कधी आणि कसा करणार हा मोठा प्रश्नच आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. तसेच खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्चदेखील ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भवानी पेठ येथील एका रस्त्याचे काम निविदा प्रक्रिया न राबवताच सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे एकाच कामासाठी तीन निविदा काढण्यात आल्या असल्याचे समोर आले होते. भाजपाच्या नगरसेवकांनी ही कामे करण्यास सांगितली असल्याची बाब समोर आली आहे. हे प्रकरण उघड होताच प्रशासनाने आता या कामासाठी काढण्यात आलेल्या तीनही निविदा रद्द करून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला.याबाबत महापौर टिळक यांनी सांगितले की, रस्ता खोदूनठेवला असल्यामुळे नागरिकांनात्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. काम करण्यामध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. अशा गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी कोणी रस्ता खोदला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येतील असे टिळक यांनी सांगितले.।संगममताने लूट होत असल्याचा आरोपमहापालिका प्रशासनाने हरीभाऊ गॅरेज परिसर काँक्रिटीकरण करणे १० लाख रुपयांचे काम, बापूसाहेब पवार कन्या शाळेमागील रस्ता काँक्रिटीकरण करणे २० लाख, रशिद शेख यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता यूटीडब्ल्यू पद्धतीने विकसित करणे २० लाख, भवानी पेठ हाऊसिंग सोसायटी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे २० लाख, प्रभाग १९ ब मधील विविध विकासकामे करणे १५ लाख अशी १९ ब आणि क मधील कामे रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता पालिकेचे अधिकारी आणि राजकारणी यांच्या संगनमताने पालिकेची लूट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.