शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

प्रस्तावित रिंगरोड रद्द करा

By admin | Updated: January 11, 2017 02:02 IST

पुणे शहराची वाहतूक समस्या सोडविण्यास पीएमआरडीएने नव्याने तिसरा रिंगरोड विकसित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

उरुळी कांचन : पुणे शहराची वाहतूक समस्या सोडविण्यास पीएमआरडीएने नव्याने तिसरा रिंगरोड विकसित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरासाठी आणखी एक प्रस्तावित असलेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा रिंगरोडचा प्रस्ताव शासनाने तातडीने रद्द करावा, तसेच या प्रस्तावित पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या क्षेत्रावरील संपादित म्हणून असलेला बाधित शेरा उठवून प्रस्तावित रिंगरोड तातडीने रद्द करण्याची मागणी एकमताने या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) येथे रविवारी (दि. ८) पूर्व हवेली तालुक्यातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासनाने पीएमआरडीएचा रिंगरोड विकसित करण्याची मान्यता दिल्याने रिंगरोडच्या संदर्भात चर्चा झाली. शासनाने पीएमआरडीएच्या मार्गाला हिरवा कंदील देऊन रिंगरोडचा तिसरा प्रस्ताव असलेल्या एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा प्रस्तावाबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने पूर्व हवेली तालुक्यातील शेतकरी या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.बैठकीत शेतकऱ्यांनी शासनाने पुणे शहरासाठी आणखी एक एमएसआरडीसीअंतर्गत तयार केलेला प्रस्ताव रद्द करण्याची बैठकीत मागणी करून हा रिंगरोड पूर्णपणे रद्दबातलच होईपर्यंत शासनाविरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर रोजी पुण्यातील मेट्रो व रिंगरोड प्रकल्पांना अंतिम मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासाठी पीएमआरडीएच्या रिंगरोडला मान्यता दिल्याने पूर्व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, कोरेगाव मूळ, बिवरी, वडकी, शिरसवडी व लोणी कंद या एमएसआरडीए (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन तातडीने शासनाने हा रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी पीएमआरडीएचा विकसित होणारा प्रस्तावित मार्ग पूर्णपणे शेती क्षेत्र नष्ट करणारा असल्याने व या मार्गालगत मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी टाऊनशिप प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळविल्याने हाच मार्ग शासनाच्या हिताचा असल्याचे मत व्यक्त करून शासनाने एमएसआरडीसीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या बैठकीस ‘यशवंत’चे माजी बाळासाहेब चोरघे, रामदास चौधरी, शारदा सोसायटीचे अध्यक्ष सोनबा चौधरी, पुणे फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष एम. एस. चौधरी, कृती समितीचे समन्वयक प्रभाकर कामठे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, सोरतापवाडी ग्रा. स. भाऊसाहेब चौधरी, राष्ट्रवादी व्यापार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर कड, भाजपा युवा नेते श्यामराव गावडे, अमित गोते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिक आक्रमक : संपादनाचे शिक्के काढापूर्व हवेली तालुक्यातून २००७मध्ये भूसंपादित केलेल्या कात्रज ते लोणीकंददरम्यान महामार्गात ६० मीटरपर्यंत भूसंपादन करून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने या महामागार्चा ३ किलोमीटरपर्यंत जवळच एमएसआरडीसीचा रिंगरोड प्रस्तावित असल्याने या मार्गाची आवश्यकता नसल्याचा शेतकऱ्यांचा रोष आहे. शासनाने १९९७, २००७ व २०१३मध्ये करोडो रुपये रिंगरोडच्या आखणीसाठी खर्च केले आहेत. त्यातच आता या रिंगरोडला मान्यता दिली असल्याने शासनाने आपली भूमिका प्रत्येक वेळी बदलून शेतकऱ्यांची होळी करण्याचा जो विचार चालवला आहे, तो थांबवावा व त्यांच्या प्रपंचाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी केली आहे.