शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

प्रस्तावित रिंगरोड रद्द करा

By admin | Updated: January 11, 2017 02:02 IST

पुणे शहराची वाहतूक समस्या सोडविण्यास पीएमआरडीएने नव्याने तिसरा रिंगरोड विकसित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

उरुळी कांचन : पुणे शहराची वाहतूक समस्या सोडविण्यास पीएमआरडीएने नव्याने तिसरा रिंगरोड विकसित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरासाठी आणखी एक प्रस्तावित असलेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा रिंगरोडचा प्रस्ताव शासनाने तातडीने रद्द करावा, तसेच या प्रस्तावित पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या क्षेत्रावरील संपादित म्हणून असलेला बाधित शेरा उठवून प्रस्तावित रिंगरोड तातडीने रद्द करण्याची मागणी एकमताने या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) येथे रविवारी (दि. ८) पूर्व हवेली तालुक्यातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासनाने पीएमआरडीएचा रिंगरोड विकसित करण्याची मान्यता दिल्याने रिंगरोडच्या संदर्भात चर्चा झाली. शासनाने पीएमआरडीएच्या मार्गाला हिरवा कंदील देऊन रिंगरोडचा तिसरा प्रस्ताव असलेल्या एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा प्रस्तावाबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने पूर्व हवेली तालुक्यातील शेतकरी या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.बैठकीत शेतकऱ्यांनी शासनाने पुणे शहरासाठी आणखी एक एमएसआरडीसीअंतर्गत तयार केलेला प्रस्ताव रद्द करण्याची बैठकीत मागणी करून हा रिंगरोड पूर्णपणे रद्दबातलच होईपर्यंत शासनाविरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर रोजी पुण्यातील मेट्रो व रिंगरोड प्रकल्पांना अंतिम मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासाठी पीएमआरडीएच्या रिंगरोडला मान्यता दिल्याने पूर्व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, कोरेगाव मूळ, बिवरी, वडकी, शिरसवडी व लोणी कंद या एमएसआरडीए (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन तातडीने शासनाने हा रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी पीएमआरडीएचा विकसित होणारा प्रस्तावित मार्ग पूर्णपणे शेती क्षेत्र नष्ट करणारा असल्याने व या मार्गालगत मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी टाऊनशिप प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळविल्याने हाच मार्ग शासनाच्या हिताचा असल्याचे मत व्यक्त करून शासनाने एमएसआरडीसीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या बैठकीस ‘यशवंत’चे माजी बाळासाहेब चोरघे, रामदास चौधरी, शारदा सोसायटीचे अध्यक्ष सोनबा चौधरी, पुणे फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष एम. एस. चौधरी, कृती समितीचे समन्वयक प्रभाकर कामठे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, सोरतापवाडी ग्रा. स. भाऊसाहेब चौधरी, राष्ट्रवादी व्यापार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर कड, भाजपा युवा नेते श्यामराव गावडे, अमित गोते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिक आक्रमक : संपादनाचे शिक्के काढापूर्व हवेली तालुक्यातून २००७मध्ये भूसंपादित केलेल्या कात्रज ते लोणीकंददरम्यान महामार्गात ६० मीटरपर्यंत भूसंपादन करून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने या महामागार्चा ३ किलोमीटरपर्यंत जवळच एमएसआरडीसीचा रिंगरोड प्रस्तावित असल्याने या मार्गाची आवश्यकता नसल्याचा शेतकऱ्यांचा रोष आहे. शासनाने १९९७, २००७ व २०१३मध्ये करोडो रुपये रिंगरोडच्या आखणीसाठी खर्च केले आहेत. त्यातच आता या रिंगरोडला मान्यता दिली असल्याने शासनाने आपली भूमिका प्रत्येक वेळी बदलून शेतकऱ्यांची होळी करण्याचा जो विचार चालवला आहे, तो थांबवावा व त्यांच्या प्रपंचाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी केली आहे.