शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

‘एमआयएम’ची मान्यता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 02:59 IST

भारतात राहायचे, आमच्याच मतांवर निवडून यायचे अन् देशविरोधी वक्तव्य करायचे, ही कोणती पद्धत? भारतात राहायचे असेल, तर देशाभिमान बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा

कोरेगाव भीमा : भारतात राहायचे, आमच्याच मतांवर निवडून यायचे अन् देशविरोधी वक्तव्य करायचे, ही कोणती पद्धत? भारतात राहायचे असेल, तर देशाभिमान बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करतानाच त्याला खासदार ओवैसी यांना देशातून हद्दपार करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनी येथील निषेध सभेत केली. खासदार असदुद्दीन ओवैसी व आमदार वारिस पठाण यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार दिल्याने राज्यात मोठे वादळ उठले आहे. आज सकाळी शिवसेना पुणे जिल्हा व शिरूर-हवेली तालुक्याच्या वतीने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील शिवाजी चौकामध्ये निषेध सभा व ओवैसी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याप्रसंगी गावडे बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख संजय देशमुख, उपतालुकाप्रमुख मधुकर भंडारे, रोहिदास शिवले, अमोल हरगुडे, वडगावशेरी महिला आघाडी प्रमुख अमृता पठारे, तालुका उपप्रमुख अलका सोनवणे, संगीता विकारे, मंजुळा सासवडे, स्वप्नाली टाकळकर व असंख्य शिवसैनिक व महिला उपस्थित होते. या वेळी सभेनंतर ओवैसी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गावडे म्हणाले, ‘‘भारताला १५० वर्षे स्वातंत्र्यलढ्याची परंपरा असल्याने प्रत्येक देशवासीयाच्या नसानसांत वंदे मातरम भिनत आहे. परंतु ओवैसी व एमआयएम पक्षाचे आमदार भारतात राहून देशविरोधी कारवाया करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करतानाच आता ‘भारतमाता की जय’ म्हणण्यासही नकार दिल्याने त्याच्यावर शासन कारवाई करेल की नाही याची वाट शिवसेना पाहणार नाही. भारतात राहायचे असेल तर देशाभिमान बाळगणे गरजेचे असून, शासन कारवाई करत नाही ही शोकांतिका असल्याने भारत आता सहिष्णुतेकडून असहिष्णुतेकडे चालला आहे काय?’’पोपट शेलार यांनी देशात राहूनही देशाभिमान बाळगण्यास लाज वाटत असेल तर पाकिस्तानात जा, असे मत व्यक्त केले.सूत्रसंचालन साईनाथ गव्हाणे यांनी केले, संजय देशमुख यांनी आभार मानले.हार्दिक पटेलच्या आंदोलनात देशाचा ध्वज पडला. देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर नोंदविला. मात्र, ओवैसी व त्याच्या पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने देशविरोधी वक्तव्य केली जाऊनही देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जात नाही, ही शोकांतिका असून, शासनाचे दुटप्पी धोरण यातून स्पष्ट असल्याचे राम गावडे यांनी सांगितले.