शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

बारामती तालुक्यात छावण्यांचे नियोजन

By admin | Updated: April 1, 2016 03:30 IST

तालुक्यातील ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. १९ गावे व २०३ वाड्यावस्त्यांना टँकरच्या

बारामती : तालुक्यातील ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. १९ गावे व २०३ वाड्यावस्त्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असताना जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे तालुक्यात जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दुष्काळी भागातील सव्वा लाखाहून अधिक लहान-मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गळीत हंगाम संपल्यामुळे उसाचे वाढेदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. याचअनुषंगाने चारा छावण्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सहकारी संस्थांमार्फत चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी छावण्यांमध्ये किती शेतकरी जनावरे सोडणार, याची माहिती गावपातळीवर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली. तालुक्यात ३० टँकरद्वारे दररोज ९१ पाण्याच्या खेपा केल्या जातात, असे पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी सांगितले. आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तहसीलदारांकडे तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. तालुक्यातील बाबुर्डी, कारखेरेवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, पानसरेवाडी, कारखेर, जराडवाडी या गावांमध्ये वर्षभरापासून टँकर सुरू आहेत. त्याचबरोबर, या वर्षी खराडेवाडी, उंडवडी सुपे, कोळोली, उंडवडी कडेपठार, वाकी, मोराळवाडी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजूबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायंबाचीवाडी, भिलारवाडी, तरडोली, मासाळवाडी, वढाणे, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे गावांसह अन्य २०३ वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आणखी टँकरचे प्रस्ताव असताना त्या ठिकाणी कायम पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीदेखील जलयुक्त शिवार योजना, चाऱ्या-नाले खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यास या कामांचा फायदा पावसाचे पाणी अडविण्यास होईल.(प्रतिनिधी) पाणीसाठा : प्लॅस्टिक टाक्यांची गरज1गावोगावी, वाड्यावस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा करताना विलंब होत आहे. नागरिक टँकरचे थेट पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे टँकर थांबून राहतो. मोठ्या गावांमध्ये अडचण येत नाही; मात्र वाड्यावस्त्यांतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे १ हजार ते ५ हजार लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या टाक्या दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, राजकीय कार्यकर्त्यांकडून मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. टाक्यांमध्ये पाणी साठविल्यास तेथून नागरिक पाणी घेऊन जातील. त्यामुळे टँकरच्या खेपादेखील वाढतील, असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी चारा डेपोसाठी जनावरांची संख्या मोजण्यात आली होती. आता जनावरांच्या छावण्यांसाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांची संख्यादेखील वाढेल.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरमार्फत सोडविला जात असताना जनावरांच्या पाण्यासाठीदेखील नियोजन करावे लागत आहे. त्याचबरोबर, चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. पाण्याच्या टँकरचे आलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी पाठविण्यात येत आहेत.