शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात छावण्यांचे नियोजन

By admin | Updated: April 1, 2016 03:30 IST

तालुक्यातील ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. १९ गावे व २०३ वाड्यावस्त्यांना टँकरच्या

बारामती : तालुक्यातील ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. १९ गावे व २०३ वाड्यावस्त्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असताना जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे तालुक्यात जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दुष्काळी भागातील सव्वा लाखाहून अधिक लहान-मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गळीत हंगाम संपल्यामुळे उसाचे वाढेदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. याचअनुषंगाने चारा छावण्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सहकारी संस्थांमार्फत चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी छावण्यांमध्ये किती शेतकरी जनावरे सोडणार, याची माहिती गावपातळीवर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली. तालुक्यात ३० टँकरद्वारे दररोज ९१ पाण्याच्या खेपा केल्या जातात, असे पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी सांगितले. आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तहसीलदारांकडे तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. तालुक्यातील बाबुर्डी, कारखेरेवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, पानसरेवाडी, कारखेर, जराडवाडी या गावांमध्ये वर्षभरापासून टँकर सुरू आहेत. त्याचबरोबर, या वर्षी खराडेवाडी, उंडवडी सुपे, कोळोली, उंडवडी कडेपठार, वाकी, मोराळवाडी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजूबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायंबाचीवाडी, भिलारवाडी, तरडोली, मासाळवाडी, वढाणे, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे गावांसह अन्य २०३ वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आणखी टँकरचे प्रस्ताव असताना त्या ठिकाणी कायम पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीदेखील जलयुक्त शिवार योजना, चाऱ्या-नाले खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यास या कामांचा फायदा पावसाचे पाणी अडविण्यास होईल.(प्रतिनिधी) पाणीसाठा : प्लॅस्टिक टाक्यांची गरज1गावोगावी, वाड्यावस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा करताना विलंब होत आहे. नागरिक टँकरचे थेट पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे टँकर थांबून राहतो. मोठ्या गावांमध्ये अडचण येत नाही; मात्र वाड्यावस्त्यांतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे १ हजार ते ५ हजार लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या टाक्या दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, राजकीय कार्यकर्त्यांकडून मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. टाक्यांमध्ये पाणी साठविल्यास तेथून नागरिक पाणी घेऊन जातील. त्यामुळे टँकरच्या खेपादेखील वाढतील, असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी चारा डेपोसाठी जनावरांची संख्या मोजण्यात आली होती. आता जनावरांच्या छावण्यांसाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांची संख्यादेखील वाढेल.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरमार्फत सोडविला जात असताना जनावरांच्या पाण्यासाठीदेखील नियोजन करावे लागत आहे. त्याचबरोबर, चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. पाण्याच्या टँकरचे आलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी पाठविण्यात येत आहेत.