शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

बांगलादेश युद्धातील मोहिमा अनेक पिढ्यासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली भारतीय लष्कराच्या तुकडीने १९७१ साली विविध मोहिमांमध्ये मिळविलेले यश हे येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली भारतीय लष्कराच्या तुकडीने १९७१ साली विविध मोहिमांमध्ये मिळविलेले यश हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आजही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी

मुख्यालय सज्ज आहे, असा विश्‍वास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी व्यक्त केला.

भारतीय लष्कराने १९७१ साली पाकिस्तानविरोधात लढलेल्या लढाईला १६ डिसेंबर रोजी ४९ वर्षे पूर्ण झाले. याच दिवशी पाकिस्तानला पराभव स्वीकारत ९३ हजार

सैनिकांसह शरणागती पत्करली. तर याच युद्धामुळे आशिया खंडाचा भूगोल बदलत बांग्लादेश या नवीन देशाची निर्मिती झाली.

याप्रसंगी दक्षिण मुख्यालयातर्फे पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या युद्धातील शहीद जवानांना मानवंदना दिली.

मुख्यालयाचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. आहुजा यांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना श्रद्धांजलि अर्पण केली. कोरोनामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्तीतीत हा सोहळा पार पडला. यावेळी या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेलेले माजी सैनिक, वीरपत्नी यांनी सहभाग घेत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

फोटो : राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे १९७१ च्या युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहताना दक्षिण मुख्यालयाचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. आहुजा.