शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आरोग्य विभागाच्या गोंधळामुळे खासगी रुग्णालयांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी लसीकरण केंद्रावरून खासगी रुग्णालयेही संभ्रमात पडली आहेत. पालिकेकडून शहरातील रुग्णालयांना लसीकरण केंद्र ...

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी लसीकरण केंद्रावरून खासगी रुग्णालयेही संभ्रमात पडली आहेत. पालिकेकडून शहरातील रुग्णालयांना लसीकरण केंद्र मंजूर झाल्याची पत्रे पाठविण्यात आली. त्यानंतर ४० पेक्षा अधिक रुग्णालयांना पुन्हा पत्र पाठवीत चुकून ही पत्रे पाठविली गेल्याचे कळविण्यात आले. वास्तविक या रुग्णालयांना शासनाने केंद्रच मान्य केले नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एकमेकांना दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा प्रकार घडला आहे.

शासनाकडून लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्यानंतर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. यासोबत काही रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला आरोग्य सेवक आणि नंतर फ्रंटलाईन वर्कर असलेल्या कर्मचाऱ्यांना लास देण्यात आली. त्यानंतर, ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. को-विन अॅपद्वारे नाव नोंदणी करून तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने केंद्रही वाढविण्यात आली. आजमितीस शहरात १०० पेक्षा अधिक लसीकरण केंद्र अस्तित्वात आहेत.

ही केंद्र वाढविण्याकरिता शासनाची परवानगी घ्यावी लागते. संबंधीत रुग्णालयाचे नाव या प्रणालीमध्ये समाविष्ट केले जाते. पालिकेकडून ३०० रुग्णालयांची नावे शासनाला कळविण्यात आली होती. परंतु, यातील ५७ रुग्णालयांमध्ये केंद्र सुरू करण्याची मान्यता देण्यात आली. यापूर्वी हे काम पाहत असलेल्या महिला अधिकाऱ्याने नव्याने जबाबदारी दिलेल्या दुसऱ्या महिला अधिकाऱ्याला माहिती देताना दिलेल्या यादीमध्ये मान्यता न दिलेली रुग्णालयांची नावेही दिली. त्यामुळे पालिकेकडून ज्यांना मान्यता देण्यात आलेली नव्हती त्यांना पत्र पाठवून केंद्र का सुरू करण्यात आली नाहीत, तसेच केंद्र सुरू करण्याबाबत पत्र पाठविण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर पत्र पाठविण्यात आलेल्या ४० पेक्षा अधिक रुग्णालयांना केंद्र सुरू करण्याची मान्यता मिळाली नसल्याचे समोर आले. त्यानंतर, उपरती झालेल्या आरोग्य विभागाने पुन्हा या रुग्णालयांना पत्र पाठवीत लसीकरण केंद्राची मान्यता मिळाली नसल्याचे तसेच चुकीने पत्र पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले. या गोंधळामुळे रुग्णालयांची मात्र तारांबळ उडाली.