शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक मंचाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहक मंचाने दिलेल्या निर्णयाची १३ वर्षांत पूर्णपणे अंमलबजावणी न केल्याने, ग्राहक मंचाने एका बांधकाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्राहक मंचाने दिलेल्या निर्णयाची १३ वर्षांत पूर्णपणे अंमलबजावणी न केल्याने, ग्राहक मंचाने एका बांधकाम व्यावसायिकाला १ वर्षांची साधी कैद व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

काजळे असोसिएटसला १० हजारांचा दंड तर विजय काजळे याला १ वर्षाची साधी कैद सुनावण्यात आली आहे. ग्राहक मंचाने १९९९च्या तक्रार अर्जावर २००६ मध्ये निकाल दिला होता. राज्य ग्राहक आयोगाने २०१६ मध्ये तो निकाल कायम केला होता. असे असतानाही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मंचाने ही शिक्षा ठोठावली. हा निर्णय ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य संगीता देशमुख आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला आहे.

या प्रकरणी नागेश नारायण मराठे, कौस्तुभ नागेश मराठे आणि ऐश्वर्या मराठे यांनी तक्रार केली होती. रंजना मराठे यांनी शनिवार पेठेत काजळे असोसिएटसकडून फ्लॅट खरेदी केला होता. त्यांना त्या फ्लॅटचा ताबा १९९५ मध्ये मिळाला. मात्र, फ्लॅटमध्ये अनेक अनियमितता व त्रुटी होत्या. आरोपींनी फ्लॅटच्या इमारतीचा मंजूर आराखडा दाखविला नाही. मनपाचे वीज जोडणी, तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीमध्ये व्यवस्थित पाणी थांबत नाही. रंगकाम, पार्किंगची जागा, इतर कामे व्यवस्थित केलेली नाही. इमारतीचे कन्व्हेयस डिड करून द्यावे, वॉटर प्रूफिंग करून देण्याची मागणी मराठे यांनी केली होती. त्यावर मंचाने वॉटर प्रूफिंगसाठी ४० लाख रुपये देण्याचा निर्णय दिला. मात्र, यावर नाराज होऊन फिर्यादी राज्य आयोगात गेले. त्यांनी २०१६ मध्ये निकाल फिर्यादीच्या बाजूने दिला. त्यानंतर, दोन वेळा आरोपीविरुद्ध वॉरंट काढून वॉटर प्रूफिंग करून घेतले. मात्र, या निर्णयाची पुढील साडेतीन वर्षांत अंमलबजावणी करू शकले नाहीत. त्यामुळे मराठे यांनी अवमान अर्ज दाखल केला होता. त्यावर ग्राहक मंचाने काजळे असोसिएटसला १० हजार रुपये दंड आणि विजय काजळे यांना १ वर्षे साधी कैद शिक्षा सुनावली आहे.

.......

ग्राहक मंचाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जिल्हा मंच, राज्य आयोग यांच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कालावधीला आरोपी मानणार नसतील, तर जनमानसात असा संदेश जाईल की, राज्य, जिल्हा आयोगाने विहिती मुदतीत आदेशाची पूर्तता करण्याचा आदेश दिल्यानंतर आदेशाची पूर्तता कधीही, केव्हाही करता येईल किंवा ग्राहकाला जाणीवपूर्वक, हेतुपुरस्पर टाळून जमेल तेव्हा आदेशाची पूर्तता केली तरी चालेल, त्यामुळे आरोपींना न्यायालयाच्या आदेशाचा धाक राहणार नाही.