शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बसस्थानक अवैध व्यवसायाचा अड्डा

By admin | Updated: July 24, 2015 04:40 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा

आळंदी : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा वापर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व वाळूचे ट्रक थांबण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून गेल्या २० वर्षांपूर्वी वाजत-गाजत या स्थानक परिसराचे भूमिपूजन केले. त्यासाठी नगर परिषदेनेही कोणतीही हरकत न घेता महामंडळासाठी जागा आरक्षित करून दिली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच पीएमटीची बस सेवा सुरू झाली. आळंदीकरांची व येथे येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली, याचा अंदाज घेऊन स्वारगेटमध्ये बसून जिल्ह्याच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कारभाऱ्यांनी आळंदीकडे कायमचेच दुर्लक्षच केल्याचे चित्र दिसून येते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी, यात्रेकरू यांचा आळंदी येथे नेहमीचा प्रवास आहे. वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले, अपंग अशा सर्वांसाठी राज्य परिवहन महामंडळाची सेवा सोयीची वाटते. परंतु, ही सेवा त्यांच्यासाठी अर्धवट आहे. याबसने प्रवास करणारे प्रवासी शिवाजीनगर किंवा स्वारगेट येथे नाइलाजास्तव उतरतात. तिथून सुरू होणारा त्यांचा प्रवास भयानक विदारक! तिथून आळंदीत येण्यासाठी पीएमपीएल हा एकमेव पर्याय समोर असल्यामुळे डोक्यावर, पाठीवर मोठे गाठोडे घेऊन धावत पळत पीएमपीची बस पकडावी लागते. (वार्ताहर)