शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे पाणी पुन्हा पेटणार

By admin | Updated: June 13, 2014 04:58 IST

एकीकडे सक्तीने प्रदूषित पाणी घ्यावे लागत असतानाच दुसरीकडे पाण्याच्या हक्कावरही पाणी सोडावे लागत असल्याने उजनी बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतला

लोणी देवकर : एकीकडे सक्तीने प्रदूषित पाणी घ्यावे लागत असतानाच दुसरीकडे पाण्याच्या हक्कावरही पाणी सोडावे लागत असल्याने उजनी बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, दरवर्षीच्या या वादाला कंटाळून आता न्यायालयात जाण्याची भूमिका समितीने घेतली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी समितीच्या वतीने पळसदेव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी (दि. १५) बैठक बोलवण्यात आली आहे.याबाबत माहिती देताना, उजनी बचाव समितीचे सदस्य अनिल खोत म्हणाले, उजनी धरणावर कोणाचा किती हक्क आहे, हे ठरवण्यासाठी तसेच पाण्याचे योग्य वाटप होण्यासाठी, तसेच पाणी प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही या बैठकीत चर्चा होणार आहे.सध्याच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने राज्य नदी संवर्धन योजना १ मार्च २०१४ रोजी तयार केली. मात्र यामध्येही उजनी धरणाच्या प्रदूषणाबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. शिवाय केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेमध्ये कृष्णा, गंगा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश करण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांत गणती असणाऱ्या भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही. राज्य शासनाला उजनी धरणातील पाणी प्रदूषणाबाबत माहिती असतानाही उजनी धरणातील पाणी प्रदूषणावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. एकंदरीत उजनी पाणी प्रदूषणाबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र या प्रदूषित पाण्याचा मनुष्यप्राण्यासह इतरही पशू, पक्षी व वनस्पतींवर विपरित परिणाम होत आहे.