शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

वीस एकर ऊस जळाला

By admin | Updated: November 26, 2014 23:37 IST

मरकळ (ता.खेड) येथे विद्युत जानित्रतील बिघाड व तारांच्या घर्षणामुळे सुमारे 2क् एकर ऊस जळून खाक झाला.

शेलपिंपळगाव :  मरकळ (ता.खेड) येथे विद्युत जानित्रतील बिघाड व  तारांच्या घर्षणामुळे सुमारे 2क् एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांच्या व तरुण कार्यकत्र्यांच्या सतर्कतेमुळे पुढील शेकडो एकर ऊस आगीपासून वाचविण्यात नागरिकांना यश मिळाले. जळीत पिकाची साखर कारखान्यांनी लवकरात - लवकर तोडणी करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांकडून केली जात आहे.
मरकळ गावच्या पश्चिमेकडील बाजूस आळंदी रस्त्याच्या लगत शेकडो एकर क्षेत्र उस पिकाखाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या उसाच्या क्षेत्रत विद्युत तारांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून, तारा हाताच्या अंतरावर पोहचल्या आहेत. याबाबत सबंधित ऊस उत्पादक शेतक:यांनी अनेकदा विद्युत महामंडळ वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु विद्युत महामंडळ कंपनीने कायमच शेतक:यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. आज दुपारी दोनच्या सुमारास याठिकाणी असलेल्या विद्युत जनित्र पासून काही तरी बिघाड घडून आल्याने व लोंमकळत्या तारा एकमेकांना लागल्याने आगीच्या ज्वाळा तयार होऊन त्या जमिनीवर पडल्या. तारांच्या खाली उस पिक असल्याने अगदी कमी वेळात पिकाने पेट घेतला. आग मोठी असल्याने फार कमी वेळात जास्त उसाचे क्षेत्र पेटत गेले.
आगीमध्ये सुभाष लोखंडे, सावकार लोखंडे, बाबासाहेब थोरात, साळूबाई खांदवे, भुजबळ, शिवाजी गोडसे, मारुती घेनंद आदी उस उत्पादक शेतक:यांचा उस जाळून भस्मसात झाला आहे. दरम्यान गावातील ग्रामस्थ व तरुण कार्यकत्र्यांनी जमा होऊन हि आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली गेली. दरम्यान या पेटलेल्या उस पिकाची तलाठी भाऊसाहेब पाटील व अधिका:यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. ऊस पिकाची ज्या कारखान्याकडे नोंद केलेली आहे, तो कारखाना हा पेटलेल्या उसाची तोडणी करणार असल्याचे अधिका:यांकडून समजते. विद्युत महामंडळ कंपनीचा कामगार गावात कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
 
4मरकळ (ता.खेड) परिसरात पाण्याची हमी असल्याने हजारो हेक्टर क्षेत्र उस पिकाच्या लागवडीखाली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील विद्युत यंत्रणा धोकादायक अवस्थेत आहे. विद्युत  तारा हाताच्या अंतरावर येऊन पोहचल्या आहेत. तर काही ठिकाणी नागरी वस्तीत घरांवर या  तारा येऊन पोहचल्या आहेत. याबाबत  विद्युत महामंडळ कंपनीकडे शेतक:यांनी वारंवार तक्रार करूनही सबंधित कंपनी शेतक:यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
 
4विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे उस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आहे. लोकवस्तीत काही  ठिकाणी तारा हाताच्या अंतरावर आलेल्या आहेत. आज उस या तारांना बळी पडला त्यामुळे विद्यत महामंडळ कंपनीने तात्काळ शेतक:यांच्या अडचणी लक्षात घेऊन झालेल्या तारांची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी माजी सरपंच अनिल लोखंडे, कैलास लोखंडे, रमेश गोडसे, सुभाष लोखंडे, सावकार लोखंडे, बाबासाहेब थोरात, साळूबाई खांदवे, शिवाजी गोडसे, मारुती घेनंद आदींसह नागरिक करत आहेत.
 
आगीला बळी पडलेल्या उसाची उद्यापासून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून तोडणी सुरु केली जाईल. ज्या शेतक:यांनी आपला उस इतर कारखान्यांना नोंदविला आहे, त्यांनी त्या कारखान्यांना संपर्क साधून ऊस तोडून घ्यावा. शेतक:यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल
- अनिल लोखंडे ,
 मा. उपाध्यक्ष. संत. तुकाराम सहकारी साखर कारखाना