शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

शिधापत्रिकेसाठी नागरिकांवर ‘मुद्रांका’चा भार

By admin | Updated: April 9, 2015 05:23 IST

विविध शासकीय कार्यालयांपासून न्यायालयातदेखील दाखल करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्कातून सूट देऊन अकरा वर्षे उलटल्यानंतरही अन्नधान्य

विशाल शिर्के, पुणेविविध शासकीय कार्यालयांपासून न्यायालयातदेखील दाखल करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्कातून सूट देऊन अकरा वर्षे उलटल्यानंतरही अन्नधान्य वितरण विभागाच्या काही परिमंडळ कार्यालयांत नवीन शिधापत्रिकेसाठी शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सक्ती केली जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. विविध सरकारी कार्यालये, न्यायालय, शाळांमध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र करायचे असेल, तर मुद्रांक शुल्क आकारला जाऊ नये, असा अध्यादेश १ जुलै २००४ मध्ये राज्य सरकारने काढला आहे. गतवर्षी शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वी काही शाळांमध्ये शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर पालकांना प्रतिज्ञापत्र मागितले जात होते. त्या वेळी काही पालकांनी नोंदणी व मुद्रांक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या वेळी तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक डॉ. श्रीकर परदेशी यांनी मुद्रांकाची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही अन्न धान्य वितरण कार्यालयात शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्राची सक्ती केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ‘लोकमत’ने याबाबत पाहणी केली असता, अन्न धान्य विभागाच्या विविध कार्यालयांत प्रतिज्ञापत्राबाबत गोंधळ असल्याचे दिसून आले. ‘लोकहित फाउंडेशन’चे अजहर खान यांनी मुद्रांक विभागाकडे ‘माहितीच्या अधिकारा’त मागविलेल्या माहितीतही हे स्पष्ट झाले आहे. अन्न धान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील म्हणाले, ‘प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांकाची आवश्यकता नाही. त्यामुळे असा प्रकार झाला असल्यास परिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मुद्रांक शुल्काची सक्ती न करण्याची सूचना देण्यात येईल.’