शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनमुळे ऊसशेतीसह पाणी वाटपावर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST

शेतकरी कृती समितीने व्यक्त केली भीती : भूलथापांना बळी न पडण्याचे केले आवाहन लासुर्णे : भवानीनगर (ता. इंदापूर) ...

शेतकरी कृती समितीने व्यक्त केली भीती : भूलथापांना बळी न पडण्याचे केले आवाहन

लासुर्णे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र बुलेट ट्रेनमुळे विभागले जाणार आहे. त्यामुळे ऊस शेतीसह शंभर वर्षांपूर्वी मिळालेल्या पाणी वाटपावरसुद्धा परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी या प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करणे गरज व्यक्त करीत प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी कुठल्याही भूलथापाला व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

इंदापूर तालुक्यातील तमाम शेतकरी बंधू व ग्रामस्थांनो जागे व्हावे. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू आहे व यासंबंधी तहसीलदार, प्रांतधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांचा कुठलाही आदेश नाही. ट्रेनमुळे पालखी महामार्गाप्रमाणे केंद्रशासनकडून करोडो रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे, असे भासवले जात आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. इंदापूर तालुक्यातील बागायती क्षेत्राची शासकीय किंमत ही प्रतिएकर आठ ते दहा लाख रुपये इतकीच आहे. त्यामुळे आज जमिनीचे बाजारभाव आहेत त्यापेक्षा अधिक पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

सदर प्रस्तावित रेल्वेमुळे या भागातील कॅनॉल, वागायती क्षेत्र व शेतक-यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. प्रत्येक क्षेत्राचे, गावाचे, रस्त्यांचे दोन भाग पडणार आहेत. सदर रेल्वे रुळाचे दोन्ही कडेला भिंतीचे कुंपण असणार आहे. यामुळे जवळच्या शेतात जाण्यासाठी पाच ते दहा किमी अंतरावरून जावे लागेल व पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन व घरे जमीनदोस्त होणार आहेत. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जमीन मात्र तेवढीच राहिली आहे, त्यामुळे भविष्यात पैसे असले तरी जमीन परत घेणे शक्य होणार नाही याची तमाम जनतेने नोंद घ्यावी. सदर सर्वे यापूर्वी पुणे-सोलापुर महामार्गालगत झाला होता मग बागायती क्षेत्रातून परत सर्वे करायचा अट्टहास कशासाठी? असा सवाल जाचक यांनी व्यक्त केला आहे.

सदर नियोजित सर्वेबाबत सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना मी स्वत: कल्पना दिलेली आहे.सदर प्रकल्प त्वरित थांबविणे विषयी विनंती केलेली आहे. सदर प्रकल्पास पक्षीय गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करणे पुढील पिढीच्या हिताचे आहे. तालुक्यातील तमाम जनतेने याबाबत जागृृत होण्याची गरजदेखील जाचक यांनी व्यक्त केली आहे.