शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘बीआरटी’चा मार्ग धोकादायकच!

By admin | Updated: September 11, 2015 04:47 IST

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जलद गती बससेवेचे (बीआरटीएस) ‘सेफ्टी आॅडिट’ न करता घाईघाईने उद्घाटन केले. त्यामुळे सांगवी-रावेत या साडेचौदा किलोमीटर

- मिलिंद कांबळे,  पिंपरीमहापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जलद गती बससेवेचे (बीआरटीएस) ‘सेफ्टी आॅडिट’ न करता घाईघाईने उद्घाटन केले. त्यामुळे सांगवी-रावेत या साडेचौदा किलोमीटर अंतराच्या मार्गावर दोनच दिवसानंतर एका पादचाऱ्याचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधींनी बीआरटी मार्गाची ‘आॅन द स्पॉट’ पाहणी गुरुवारी केली. त्या वेळी बीआरटी सेवा अद्याप असुरक्षित आणि धोकादायक असल्याचे चित्र समोर आले. बीआरटी मार्गाभोवती पूर्णपणे सुरक्षा कठडे उभारले नाहीत. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्ता शॉर्टकट म्हणून बीआरटी मार्गाचा उपयोग जीव धोक्यात घालून करीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा जागावाजा करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच सप्टेंबरला बीआरटी मार्गाचे उदघाटन केले. मात्र, बीआरटी मार्ग नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचे कोणतीही पाहणी व तपासणी थर्ड पार्टीकडूून करण्यात आलेले नाही. सांगवी ते किवळे मार्गावर अद्याप सर्व ठिकाणी संरक्षक कठडे बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे पादचारी जीव धोक्यात घालून सर्रासपणे ये-जा करतात. दोन दिवसांपूर्वी एका पादचाऱ्याचा या मार्गावर नाहक बळी गेला. त्यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या बीआरटीएस मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मार्गावर अनेक ठिकाणी कठडे व बॅरेकेटमध्ये रिकामी जागा, तर काही ठिकाणी बॅरेकेट तुटलेले दिसले. या छोट्याशा फटीतूनही पादचारी बीआरटीएस मार्गात घुसत आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशी व पादचा-यांची संख्या सर्वाधिक आहे. औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालय, थेरगाव, जगताप डेअरी, सांगवी, पिंपळे निलख येथे बिनदिक्कतपणे पादचारी बीआरटीएस मार्गातून रस्ता ओलांडताना दिसून आले. मात्र, त्याठिकाणी कोणताही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. दुभाजक ओलांडण्याची कसरत...बीआरटीएस मार्गावर काही लोखंडी बॅरकेट तुटले होते, तर काही वाकले होते. काही कठड्याचे पत्रे बाहेर आले होते. त्यामुळे जवळून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे. सुरक्षा कठडे आणि उंच दुभाजकावर उड्या मारून काही जण सहजपणे रस्ता क्रॉस करीत होते. समोरून बस आली तरी, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. कठड्याला खेटून उभे राहत बसला वाट करून देण्याचा गंभीर प्रकार पहायला मिळाला. बस पुढे गेल्यानंतर सहजपणे दुभाजकावरून उडी मारून पलीकडचा रस्ता गाठण्याची कसरत केली जात आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांना सर्वाधिक धोका आहे. बॅरिगेट्सची दुरवस्थाप्रत्येक बसथांब्यावर सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, ते प्रवाशांना मार्गदर्शन करण्यापेक्षा पेपर वाचण्यात दंग दिसले. अनेक सुरक्षारक्षक खुर्चीत बसून आराम करताना दिसले. प्रवाशांच्या ये-जा करण्याकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसले. थांब्यावरील दरवाजे उघडे असले, तरी ते त्याबाबत काहीच करताना दिसत नव्हते. सुरक्षा व्यवस्था खिळखिळी...बीआरटीएस मार्गावर वाहन लावण्यास बंदी असताना त्या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षक किंवा वॉर्डनने स्वत:ची दुचाकी तेथे बिनदिक्कतपणे मार्गावर लावली होती. इतर वाहनांना मात्र अटकाव केला जात होता. रस्ता क्रॉस होत असलेल्या ठिकाणी वॉर्डन थांबलेले असल्याने दुचाकी वा चारचाकी वाहने बीआरटीएसमध्ये शिरत नव्हते. बहुतेक वॉर्डन पावसात दक्ष असल्याचे चित्र होते. कोणत्याही वाहनास ते प्रवेश देत नव्हते. मात्र, अनेक सिग्नल बंद होते.