शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मालक करण्यासाठी कायदे आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

हडपसर : शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत. काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी ...

हडपसर : शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत. काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी भूमिका घेत आहे, अशी टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्र सरकारने मंजुर केलेल्या तीन कृषी विधेयक कायद्यावरुन सध्या देशात अंसतोष निर्माण झालेले आहे. दिल्लीत या कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपच्यावतीने देशभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी बैलगाडीमधून रॅली काढण्यात आली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार जगदीश मुळीक, राहुल कुल, सिध्दार्थ शिरोळे, बाबुराव पाचारणे, बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कंत्राटी शेती करताना काही वाद झालेत तर शेतकऱ्यांना आता कोर्टात जाता येणार आहे. हे या कायद्यात आहे. राज्यातील सरकारने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. केळीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता मदत मिळाली नाही.

चौकट

राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेव्हा ५० हजार रूपये हेक्टरी देऊ असे म्हटले होते. तर बागायत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात ८ हजार रूपये दिले आहेत. त्यामुळे ‘राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला'''''''' अशी स्थिती झाली आहे. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका केली.

फोटो : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद यात्रा काढण्यात आली.