शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून भाऊंनी कार्य केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:13 IST

इंदापूर : तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणांमधून भाऊंचा सहवास लाभला आहे. आमदार, राज्यमंत्री, महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून ...

इंदापूर : तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणांमधून भाऊंचा सहवास लाभला आहे. आमदार, राज्यमंत्री, महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून आणि पालकमंत्री तसेच खासदार म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्या पिढीतील लोक त्यांच्या कार्याचे गौरउद्गार काढतात. भाऊंनी नि:स्वार्थीपणाने सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून कार्य केले, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

माजी खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर महाविद्यालयातील समाधिस्थळाचे हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. या वेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आप्पासाहेब जगदाळे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, संस्थेचे खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, संचालक विलासराव वाघमोडे, आबा पाटील, पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, विष्णू मोरे उपस्थित होते. अभिवादनप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अनेक सहकारी संस्था स्थापन करून सर्वसामान्यांचा विकास भाऊंनी केला आहे. इंदापूर महाविद्यालयात कम्युनिटी रेडिओ उभारणीचे काम प्रगतिपथावर असून इंदापूरकरांना लवकरच रेडिओ (एफएम ९०.४) ऐकण्याची संधी मिळणार आहे. अनेक शैक्षणिक संस्थांचे कार्य प्रगतिपथावर आहे.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा घेण्यात आली होती. यामध्ये ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी मानले. उपस्थित कर्मयोगी परिवाराने भाऊंच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.