शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेले पूल, साईडपट्ट्या अन् कच-याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:39 IST

वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले

लोणी काळभोर : वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले कच-याचे ढीग दिसत आहेत. प्रत्येक वेळी एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतरच शासन व्यवस्था काम करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या भागातील चारपदरी रस्त्याचे काम ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले. गेली १२ वर्षे टोलवसुलीचे काम नियमानुसार सुरू आहे. परंतु रस्तादुरूस्ती समवेत प्रवाशांना इतर सुविधा देण्याबाबत तसेच महामार्गालगतच्या संरक्षक जाळ्या, रुग्णवाहिका आदी सोयीसुविधा देण्याबाबत सदर कंपनी असमर्थता दाखवत आहे.नाही म्हणायला अधुनमधून महामार्गावर असलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येते. पण त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून लगत असलेल्या साईडपट्ट्या न भरल्याने बºयाच ठिकाणी सुमारे एक फूट उंचीचे खड्डे पडलेले दिसत आहेत. ते भरले नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक खड्डे लोणी फाटा, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ मंदिर व यवत दरम्यान अनेक ठिकाणी पडले आहेत.सन २००४ मध्ये चौपदरी महामार्ग तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये जनावरे व नागरिक महामार्गावर येऊन अपघात होऊ नयेत, म्हणून लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु सध्या बहुतांश ठिकाणची जाळी गायब झालेली आहे.टोल कंपन्यांना महामार्गावर एखादा अपघात झाला तर जखमींना तातडीची मदत मिळावी, म्हणून अ‍ॅम्ब्युलन्स व वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, ही सुविधाही उपलब्ध नसल्याने अपघात झाला तर पोलिसांनाच याची पूर्तता करावी लागते. तसेच रस्त्याच्या मध्यावर असलेले दुभाजक अवघे ९ इंच उंचीचे असल्याने अपघातसमयी एखादे वाहन भरधाव वेगात असेल तर थेट ते ओलांडून पलीकडे जाऊन अपघाताच्या तीव्रतेत वाढ होते. यामुळे अनेकजण प्राणास मुकले आहेत.मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक केली जाते. वाहतूक करताना वाळू महामार्गावर सांडते. या सांडलेल्या वाळूवरून अनेक दुचाकी वाहने घसरून अपघात झालेले आहेत. कधी हात-पाय मोडण्यावर भागते तर कधी दुचाकीचालकाचा जीवही जातो.