शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रिटिशकालीन तलावात अत्यल्प साठा, २८ लाख वीजबिल थकबाकीत अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:37 IST

बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सुपे : बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र जनाईचे पाणी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे २८ लाख वीजबिलाच्या थकबाकीत अडकले आहे. तसेच ब्रिटिशकालीन तलावातही अत्यल्प पाणीसाठा राहिलेला आहे.यावर्षी सुपे परगण्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मागील दोन महिन्यांपासून जनाई योजनेतून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील शेतकरी वीजबिलाची रक्कम भरण्यास तयार होते.मात्र मागणी करूनही २८ लाख थकबाकी असल्याने पाणी सोडण्यात आले नाही.त्यामुळे अनेक गावांचे तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटंकती करावी लागत आहे. सुपे येथील ब्रिटिशकालीन तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे येथे पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या तलावांतर्गत इतर गावांना नळ-पाणीपुरवठा सुरू आहे.>तलावातील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ, संजय दरेकर यांनी दिली. दरम्यान, जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे तातडीने पाणी सोडण्याबाबत शेकडो सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पाटबंधारे प्रकल्प विभागाला दिल्याची माहिती वाघयांनी दिली.