शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

वंचितांना मुख्य प्रवाहात आणावे : आमटे

By admin | Updated: January 9, 2017 03:24 IST

भामरागडसारख्या परिसरात आदिवासींसह अनेक समाज विविध मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्या समाजाला त्यांच्या गरजा

रावेत : भामरागडसारख्या परिसरात आदिवासींसह अनेक समाज विविध मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्या समाजाला त्यांच्या गरजा  पुरवून जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य म्हणजेच खरी समाजसेवा आहे. आपल्याकडे सर्व संपत्ती असून, आपल्या तक्रारी संपत नाहीत; पण आदिवासी बांधवांकडे काही नसताना ते कधी तक्रार करीत नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले. संस्कार प्रतिष्ठानाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  आमटे म्हणाले, ‘‘आयुष्यात साहस गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य मिळमिळीत होते. आता  भारत महासत्ता होतो आहे, असे म्हणतानाही विषमता कायम आहे. ४० टक्के आदिवासी दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांचा विचार आपण करायलाच हवा.’’ डॉ. शांताराम कारंडे, सतीश पाटील, अरुण बोऱ्हाडे, करुणा चिंचवडे, रवींद्र चव्हाण, दीपक शेलार, सुवर्णा शिंदे, गणेश कदम, प्रशांत हंबर, विनोद पवार, राजेंद्र वाघ, डॉ. किरण जोशी, जगन्नाथ शिंदे, प्रसन्ना पदमवार, बालशाहीर चैतन्य काजुळकर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.