शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

मुळशीचे पाणी पुणे-पिंपरीसाठी आणावे

By admin | Updated: October 2, 2015 00:45 IST

मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल

पुणे : मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल. टाटाकडून जेवढी वीज तयार केली जाते, तेवढी वीज त्यांना शासनाने द्यावी व मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी आणावे, अशी मागणी राज्याचे माजी जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.महापालिकेच्या वतीने मुंढवा-केशवनगर येथे उभारण्यात आलेल्या जॅकवेल प्रकल्पाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजपासून कार्यान्वित झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, खासदार वंदना चव्हाण, आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.भामा आसखेड धरणामधून अडीच टीएमसी पाणी नगर रस्ता परिसरासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. जायका प्रकल्पातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची शहरामध्ये उभारणी झाल्यास चांगले पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.विजय शिवतारे म्हणाले, ‘‘पुणे शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून, ते पुण्याला दिले जात आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. मुंढवा जॅकवेलमधून पाणी उचलून ते बेबी कॅनॉलमध्ये टाकले जाणार आहे. बेबी कॅनॉल अनेक वर्षांपासून बंद होते, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तातडीने १६ कोटी रुपये मंजूर केले आहे.’’ शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘‘मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून नदीतून वाहणारे सांडपाणी उचलून ते शेतीसाठी दिले जात आहे. त्याचा पिण्यासाठी किंवा जनावरांसाठी वापर करता येणार नाहीच; मात्र किमान ते शेतीयोग्य तरी असेल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे’’ दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविक केले, तर स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कमळाच्या ८ आमदारांनी एवढे करावेचभामा आसखेडमधून शहराला अडीच टीएमसी पाणी देण्याच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा १७५ कोटी रुपयांचा भार पुणे महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे; मात्र हा खर्च महापालिकेकडून न घेता राज्य शासनाने उचलणे आवश्यक आहे. शहरातून सर्व आठच्या आठ कमळाचे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरून महापालिकेवरचा हा बोजा कमी करावा, असे आवाहन अजित पवार यांनी या वेळी बोलताना केले.