शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

मुळशीचे पाणी पुणे-पिंपरीसाठी आणावे

By admin | Updated: October 2, 2015 00:45 IST

मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल

पुणे : मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल. टाटाकडून जेवढी वीज तयार केली जाते, तेवढी वीज त्यांना शासनाने द्यावी व मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी आणावे, अशी मागणी राज्याचे माजी जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.महापालिकेच्या वतीने मुंढवा-केशवनगर येथे उभारण्यात आलेल्या जॅकवेल प्रकल्पाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजपासून कार्यान्वित झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, खासदार वंदना चव्हाण, आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.भामा आसखेड धरणामधून अडीच टीएमसी पाणी नगर रस्ता परिसरासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. जायका प्रकल्पातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची शहरामध्ये उभारणी झाल्यास चांगले पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.विजय शिवतारे म्हणाले, ‘‘पुणे शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून, ते पुण्याला दिले जात आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. मुंढवा जॅकवेलमधून पाणी उचलून ते बेबी कॅनॉलमध्ये टाकले जाणार आहे. बेबी कॅनॉल अनेक वर्षांपासून बंद होते, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तातडीने १६ कोटी रुपये मंजूर केले आहे.’’ शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘‘मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून नदीतून वाहणारे सांडपाणी उचलून ते शेतीसाठी दिले जात आहे. त्याचा पिण्यासाठी किंवा जनावरांसाठी वापर करता येणार नाहीच; मात्र किमान ते शेतीयोग्य तरी असेल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे’’ दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविक केले, तर स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कमळाच्या ८ आमदारांनी एवढे करावेचभामा आसखेडमधून शहराला अडीच टीएमसी पाणी देण्याच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा १७५ कोटी रुपयांचा भार पुणे महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे; मात्र हा खर्च महापालिकेकडून न घेता राज्य शासनाने उचलणे आवश्यक आहे. शहरातून सर्व आठच्या आठ कमळाचे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरून महापालिकेवरचा हा बोजा कमी करावा, असे आवाहन अजित पवार यांनी या वेळी बोलताना केले.