शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीचे पाणी पुणे-पिंपरीसाठी आणावे

By admin | Updated: October 2, 2015 00:45 IST

मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल

पुणे : मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल. टाटाकडून जेवढी वीज तयार केली जाते, तेवढी वीज त्यांना शासनाने द्यावी व मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी आणावे, अशी मागणी राज्याचे माजी जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.महापालिकेच्या वतीने मुंढवा-केशवनगर येथे उभारण्यात आलेल्या जॅकवेल प्रकल्पाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजपासून कार्यान्वित झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, खासदार वंदना चव्हाण, आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.भामा आसखेड धरणामधून अडीच टीएमसी पाणी नगर रस्ता परिसरासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. जायका प्रकल्पातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची शहरामध्ये उभारणी झाल्यास चांगले पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.विजय शिवतारे म्हणाले, ‘‘पुणे शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून, ते पुण्याला दिले जात आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. मुंढवा जॅकवेलमधून पाणी उचलून ते बेबी कॅनॉलमध्ये टाकले जाणार आहे. बेबी कॅनॉल अनेक वर्षांपासून बंद होते, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तातडीने १६ कोटी रुपये मंजूर केले आहे.’’ शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘‘मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून नदीतून वाहणारे सांडपाणी उचलून ते शेतीसाठी दिले जात आहे. त्याचा पिण्यासाठी किंवा जनावरांसाठी वापर करता येणार नाहीच; मात्र किमान ते शेतीयोग्य तरी असेल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे’’ दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविक केले, तर स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कमळाच्या ८ आमदारांनी एवढे करावेचभामा आसखेडमधून शहराला अडीच टीएमसी पाणी देण्याच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा १७५ कोटी रुपयांचा भार पुणे महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे; मात्र हा खर्च महापालिकेकडून न घेता राज्य शासनाने उचलणे आवश्यक आहे. शहरातून सर्व आठच्या आठ कमळाचे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरून महापालिकेवरचा हा बोजा कमी करावा, असे आवाहन अजित पवार यांनी या वेळी बोलताना केले.