शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मुळशीचे पाणी पुणे-पिंपरीसाठी आणावे

By admin | Updated: October 2, 2015 00:45 IST

मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल

पुणे : मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल. टाटाकडून जेवढी वीज तयार केली जाते, तेवढी वीज त्यांना शासनाने द्यावी व मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी आणावे, अशी मागणी राज्याचे माजी जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.महापालिकेच्या वतीने मुंढवा-केशवनगर येथे उभारण्यात आलेल्या जॅकवेल प्रकल्पाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजपासून कार्यान्वित झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, खासदार वंदना चव्हाण, आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.भामा आसखेड धरणामधून अडीच टीएमसी पाणी नगर रस्ता परिसरासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. जायका प्रकल्पातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची शहरामध्ये उभारणी झाल्यास चांगले पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.विजय शिवतारे म्हणाले, ‘‘पुणे शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून, ते पुण्याला दिले जात आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. मुंढवा जॅकवेलमधून पाणी उचलून ते बेबी कॅनॉलमध्ये टाकले जाणार आहे. बेबी कॅनॉल अनेक वर्षांपासून बंद होते, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तातडीने १६ कोटी रुपये मंजूर केले आहे.’’ शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘‘मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून नदीतून वाहणारे सांडपाणी उचलून ते शेतीसाठी दिले जात आहे. त्याचा पिण्यासाठी किंवा जनावरांसाठी वापर करता येणार नाहीच; मात्र किमान ते शेतीयोग्य तरी असेल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे’’ दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविक केले, तर स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कमळाच्या ८ आमदारांनी एवढे करावेचभामा आसखेडमधून शहराला अडीच टीएमसी पाणी देण्याच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा १७५ कोटी रुपयांचा भार पुणे महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे; मात्र हा खर्च महापालिकेकडून न घेता राज्य शासनाने उचलणे आवश्यक आहे. शहरातून सर्व आठच्या आठ कमळाचे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरून महापालिकेवरचा हा बोजा कमी करावा, असे आवाहन अजित पवार यांनी या वेळी बोलताना केले.