शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सुमित्रा भावे यांचा अल्प परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:10 IST

सुमित्रा भावे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले खरे: पण सुरुवातीच्या काळात कला माध्यमाबद्दल त्यांना विशेष माहिती नव्हती. ...

सुमित्रा भावे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले खरे: पण सुरुवातीच्या काळात कला माध्यमाबद्दल त्यांना विशेष माहिती नव्हती. त्यांनी चित्रपट निर्मितीमधील सर्व अंगांचे ज्ञान आत्मसात केले. दिग्दर्शिका, पटकथा लेखिका, निर्माती या माध्यमांतून त्या चित्रपटाच्या ‘वन मॅन आर्मी’ झाल्या. टिपीकल लव्हस्टोरी, मसाला, मेलोड्रामा यापेक्षा चाकोरीबाहेरील सामाजिक संवेदनशील विषयांची पेरणी त्यांनी चित्रपटांमधून केली. सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. आगरकर हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. अनेक छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्तनिवेदनही केले. १९६५ सालापर्यंत त्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यात त्यांनी विविध संस्थांवर काम केले. पुणे येथील कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये काही काळ त्यांनी शिकविण्याचे काम केले. स्त्री-वाणी संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. समाजकार्य विषयात पीएच.डी.चे शिक्षण अपूर्ण राहिले असले, तरी पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. १९८५ मध्ये स्त्रीवाणीसाठी त्यांनी पहिला लघुपट तयार केला. त्यांनी 'बाई' या चित्रपटातून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला होता. त्या चित्रपटाला विविध पुरस्कार मिळाले. या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९५ साली त्यांनी ‘दोघी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यावेळी त्यांना दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची चित्रपट निर्मितीत साथ मिळाली. या दोघांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, दहा राष्ट्रीय, चाळीस हून अधिक राज्य पुरस्कार आणि अन्य पुरस्कार मिळाले. या चित्रपटांचे देश- विदेशातील अनेक महोत्सवात प्रदर्शन झाले. संहितालेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सुमित्रा यांनी चित्रपटांमधून मानवी मन, नातेसंबंध आणि समाज यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . त्यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) संस्थेसाठी ‘माझी शाळा’ ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणाऱ्या दूरदर्शन मालिकेची निर्मित केली. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. ‘दिठी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेला नाही.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या सहकार्याने त्यांनी मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आजारांवर देखील चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकत जनजागृतीचे काम केले. त्यांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील चित्रपट दिग्दर्शन व निर्मितीच्या उत्तुंग व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१८ साली मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणेच्या वतीने मानाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय पुणे प्राईड पुरस्कार, शाहूमहाराज जीवनगौरव पुरस्काराच्या देखील त्या मानकरी ठरल्या आहेत.

--------------------------

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

अस्तु

एक कप च्या

कासव

घो मला असला हवा

जिंदगी जिंदाबाद (हिंदी)

दहावी फ

देवराई

दोघी

नितळ

फिर जिंदगी (हिंदी लघुपट)

बाधा

बेवक्त बारिश (हिंदी लघुपट)

मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट)

वास्तुपुरुष

संहिता

हा भारत माझा

दिठी

------------------------------------------------------------------