शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नीरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले

By admin | Updated: July 6, 2015 04:17 IST

वालचंदनगर-नातेपुते रस्त्याच्या नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. कठडे बसवण्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

कळंब : वालचंदनगर-नातेपुते रस्त्याच्या नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. कठडे बसवण्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता प्रवासासाठी संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशी वर्गात नाराजी आहे. वालचंदनगर ते नातेपूते हा वीस किलोमीटर अंतर असणारा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर कळंब येथील नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे काही वर्षांपासून चोरीस गेले आहेत. शासनाकडून नवीन कठडे बसवण्याबाबतउदासिनता दिसून येत आहे. हा रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यावर लांब पल्ल्याच्या एसटी बस दररोज कराड, कोल्हापूर, सांगली आदी ये-जा करत असतात. तसेच, या रस्त्यावरून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वालचंदनगर व कळंबमध्ये एसटी बसने प्रवास करतात. हा रस्ता प्रवासासाठी संरक्षक कठडे नसल्यामुळे धोकादायक बनला आहे. या पुलावरून पाणी वाहत असताना कठडे नसल्यामुळे मोटारसायकल, जीप अशी वाहने वाहून गेली आहेत. त्यामुळे या पुलाचे संरक्षक कठडे बसविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)