शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रेल्वे क्रॉसिंगचा मोकळा श्वास

By admin | Updated: March 15, 2016 04:21 IST

लष्कराच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील लुल्लानगर तसेच घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी महानगर पालिकेने दिलेल्या प्रस्तावास पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव

पुणे : लष्कराच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील लुल्लानगर तसेच घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी महानगर पालिकेने दिलेल्या प्रस्तावास पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव आता दिल्लीतील डिफेन्स मिनिस्टर आॅफिसला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याला अंतिम मान्यता मिळ्णार आहे. या उड्डाणपुलामुळे या तीनही रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी फुटणार असून, या परिसरातील नागरिक मोकळा श्वास घेणार आहेत. या तीनही उड्डडाणपुलांना लष्कराने आक्षेप घेतला होता. या पुलांच्या मान्यतेसाठी सोमवारी दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. दरम्यान, घोरपडी येथील सोलापूर रेल्वे मार्गावरील पुलाच्या आराखड्याबाबत लष्काराने काही आक्षेप घेतले असून, या पुलाचा नवीन आराखडा महापालिकेस सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, वाहतूक नियोजन अधिकारी श्रीनिवास बोनाला, डिफेन्स एस्टेटच्या संचालिका सुंदरी पुजारी, ब्रिगेडियर त्यागी तसेच राज्यसभेतील खासदार अमर साबळे उपस्थित होते. या उड्डाणपुलांबाबत डिसेंबर २0१५मध्ये पुण्यात झालेल्या बैठकीच्या पुढील कार्यवाहीसाठी आज दिल्लीत ही बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात घोरपडी येथील दोन उड्डाणपुलामधील मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावासदेखील पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, लवकरच संरक्षण मंत्रालयातून त्यास अंतिम मान्यता मिळेल. तसेच सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाबाबत बी. टी. कवडे रस्त्यावर रुंदीकरणाचा एक पर्याय सुचविण्यात आला असून, त्याची व्यवहार्यता तपासून महानगरपालिकेने त्याचा अहवाल ३१ मार्च १६पर्यंत पुणे सब एरियाला सादर करावा, असे निश्चित करण्यात आले आहे. या शिवाय, बाकी हिल ते वानवडी पोलीस स्टेशनदरम्यान पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनदेखील बैठकीत संरक्षणमंत्र्यांकडून मिळाले असल्याची शिरोळे यांनी सांगितले.कोंडी फुटणार ... या उड्डाणपुलामध्ये प्रामुख्याने घोरपडी गावातील दोन रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी मोठी समस्या बनली आहे. सकाळी व सायंकाळी या क्रॉसिंगवर वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यातच या वेळेत रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची संख्याही अधिक असल्याने प्रत्येक अर्ध्या तासाला रेल्वे गेट बंद होते. त्यानंतर घाईगडबडीने जाण्यासाठी वाहनचालकांची स्पर्धा असल्याने या क्रॉसिंगवर जीवघेणी वाहतूककोंडी होते.