शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

रेल्वे क्रॉसिंगचा मोकळा श्वास

By admin | Updated: March 15, 2016 04:21 IST

लष्कराच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील लुल्लानगर तसेच घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी महानगर पालिकेने दिलेल्या प्रस्तावास पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव

पुणे : लष्कराच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील लुल्लानगर तसेच घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी महानगर पालिकेने दिलेल्या प्रस्तावास पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव आता दिल्लीतील डिफेन्स मिनिस्टर आॅफिसला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याला अंतिम मान्यता मिळ्णार आहे. या उड्डाणपुलामुळे या तीनही रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी फुटणार असून, या परिसरातील नागरिक मोकळा श्वास घेणार आहेत. या तीनही उड्डडाणपुलांना लष्कराने आक्षेप घेतला होता. या पुलांच्या मान्यतेसाठी सोमवारी दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. दरम्यान, घोरपडी येथील सोलापूर रेल्वे मार्गावरील पुलाच्या आराखड्याबाबत लष्काराने काही आक्षेप घेतले असून, या पुलाचा नवीन आराखडा महापालिकेस सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, वाहतूक नियोजन अधिकारी श्रीनिवास बोनाला, डिफेन्स एस्टेटच्या संचालिका सुंदरी पुजारी, ब्रिगेडियर त्यागी तसेच राज्यसभेतील खासदार अमर साबळे उपस्थित होते. या उड्डाणपुलांबाबत डिसेंबर २0१५मध्ये पुण्यात झालेल्या बैठकीच्या पुढील कार्यवाहीसाठी आज दिल्लीत ही बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात घोरपडी येथील दोन उड्डाणपुलामधील मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावासदेखील पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, लवकरच संरक्षण मंत्रालयातून त्यास अंतिम मान्यता मिळेल. तसेच सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाबाबत बी. टी. कवडे रस्त्यावर रुंदीकरणाचा एक पर्याय सुचविण्यात आला असून, त्याची व्यवहार्यता तपासून महानगरपालिकेने त्याचा अहवाल ३१ मार्च १६पर्यंत पुणे सब एरियाला सादर करावा, असे निश्चित करण्यात आले आहे. या शिवाय, बाकी हिल ते वानवडी पोलीस स्टेशनदरम्यान पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनदेखील बैठकीत संरक्षणमंत्र्यांकडून मिळाले असल्याची शिरोळे यांनी सांगितले.कोंडी फुटणार ... या उड्डाणपुलामध्ये प्रामुख्याने घोरपडी गावातील दोन रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी मोठी समस्या बनली आहे. सकाळी व सायंकाळी या क्रॉसिंगवर वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यातच या वेळेत रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची संख्याही अधिक असल्याने प्रत्येक अर्ध्या तासाला रेल्वे गेट बंद होते. त्यानंतर घाईगडबडीने जाण्यासाठी वाहनचालकांची स्पर्धा असल्याने या क्रॉसिंगवर जीवघेणी वाहतूककोंडी होते.