शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

साखरदराच्या घसरणीला ब्रेक

By admin | Updated: December 19, 2015 03:05 IST

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार

सोमेश्वरनगर : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊसउत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखर दरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल. साखरेचे दर १५ दिवसांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य बँकेने अजूनही साखरेच्या मूल्यांकनात वाढ केलेली नाही. राज्य बँकेने साखरदर वाढताच साखरेच्या मूल्यांकनात वाढ करण्याची गरज असल्याचे मत ऊसउत्पादक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पहिल्या उचलीच्या भिजत पडलेल्या घोंगड्याचा प्रश्न मार्गी लागेल. १ डिसेंबर रोजी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल ११५ रुपयांनी वाढ केली होती; त्यामुळे साखरेचे मूल्यांकन २,३८५ रुपयांवर गेले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांत साखरेच्या दरात २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. मात्र, साखरेचे दर घटल्यानंतर बँक मागील ३ महिन्यांच्या सरासरीचा विचार न करता लगेचच मूल्यांकन कमी करते. मात्र, साखरदर वाढल्यानंतर बँक तिच्या सवडीने मूल्यांकन वाढविते. त्यासाठी ३ महिन्यांच्या साखरेच्या दराची नियामावली लावत नाही. काल सोमेश्वर कारखान्यावर साखरेच्या झालेल्या निविदेला साखरेला २,७१५ तर उच्च प्रतीच्या साखरेला २,८३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. एफआरपीसाठी कारखानदारांना दिलासा मिळणार१ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होते. यामध्ये ११५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी ११५ रुपयांनी वाढ केल्याने ते २,३८५ रुपयांवर गेले होते.काल पुन्हा साखर २,८३० रुपये क्विंटलवर गेल्याने एफआरपी देण्यासाठी कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. राज्य बँकेने या वाढलेल्या साखरेचे मूल्यांकन त्वरित वाढवावे, अशी मागणी ऊसउत्पादक करीत आहेत.८०:२०एफआरपी फॉर्म्युलायापूर्वीच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ऊसउत्पादकांना ९० टक्क्यांपर्यंत उचल देण्यास सांगितले होेते. त्याप्रमाणे राज्य बँकेने जर सध्याचे साखरेचे दर पाहता, २,५०० ते २,५५० पर्यंत साखरेचे मूल्यांकन करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे ऊसउत्पादकांना पहिली उचल १,८०० रुपये मिळणे शक्य होईल. एफाआरपी ८०:२० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्क्यांप्रमाणे देण्यास कारखान्यांना फारसे अवघड जाणार नाही. गेल्या १५ दिवसांपूर्वी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात ११५ रुपये वाढ केली होती़ ती आम्ही तातडीने कारखान्यांना दिली़ आता जर शासनाने व राज्य बँकेने पुन्हा आदेश दिले तर त्वरित अंमलबजावणी करू़- रमेश थोरात़, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक़