शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

साखरदराच्या घसरणीला ब्रेक

By admin | Updated: December 19, 2015 03:05 IST

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार

सोमेश्वरनगर : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊसउत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखर दरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल. साखरेचे दर १५ दिवसांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य बँकेने अजूनही साखरेच्या मूल्यांकनात वाढ केलेली नाही. राज्य बँकेने साखरदर वाढताच साखरेच्या मूल्यांकनात वाढ करण्याची गरज असल्याचे मत ऊसउत्पादक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पहिल्या उचलीच्या भिजत पडलेल्या घोंगड्याचा प्रश्न मार्गी लागेल. १ डिसेंबर रोजी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल ११५ रुपयांनी वाढ केली होती; त्यामुळे साखरेचे मूल्यांकन २,३८५ रुपयांवर गेले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांत साखरेच्या दरात २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. मात्र, साखरेचे दर घटल्यानंतर बँक मागील ३ महिन्यांच्या सरासरीचा विचार न करता लगेचच मूल्यांकन कमी करते. मात्र, साखरदर वाढल्यानंतर बँक तिच्या सवडीने मूल्यांकन वाढविते. त्यासाठी ३ महिन्यांच्या साखरेच्या दराची नियामावली लावत नाही. काल सोमेश्वर कारखान्यावर साखरेच्या झालेल्या निविदेला साखरेला २,७१५ तर उच्च प्रतीच्या साखरेला २,८३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. एफआरपीसाठी कारखानदारांना दिलासा मिळणार१ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होते. यामध्ये ११५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी ११५ रुपयांनी वाढ केल्याने ते २,३८५ रुपयांवर गेले होते.काल पुन्हा साखर २,८३० रुपये क्विंटलवर गेल्याने एफआरपी देण्यासाठी कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. राज्य बँकेने या वाढलेल्या साखरेचे मूल्यांकन त्वरित वाढवावे, अशी मागणी ऊसउत्पादक करीत आहेत.८०:२०एफआरपी फॉर्म्युलायापूर्वीच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ऊसउत्पादकांना ९० टक्क्यांपर्यंत उचल देण्यास सांगितले होेते. त्याप्रमाणे राज्य बँकेने जर सध्याचे साखरेचे दर पाहता, २,५०० ते २,५५० पर्यंत साखरेचे मूल्यांकन करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे ऊसउत्पादकांना पहिली उचल १,८०० रुपये मिळणे शक्य होईल. एफाआरपी ८०:२० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्क्यांप्रमाणे देण्यास कारखान्यांना फारसे अवघड जाणार नाही. गेल्या १५ दिवसांपूर्वी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात ११५ रुपये वाढ केली होती़ ती आम्ही तातडीने कारखान्यांना दिली़ आता जर शासनाने व राज्य बँकेने पुन्हा आदेश दिले तर त्वरित अंमलबजावणी करू़- रमेश थोरात़, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक़