शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेल लिपीला हवी आधुनिकतेची जोड

By admin | Updated: January 4, 2016 00:57 IST

शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक

चिंचवड : शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. ब्रेल लिपीने अंधांना दिशा दिली असली, तरीही या शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याशिवाय अंध बांधवांचे जीवन प्रकाशमय होणार नाही, असे मत अंध शिक्षणप्रणालीत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.अंध व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु यातील उदासीन धोरणांमुळे याची अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंध:कारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरीकाठी काठी अंधांच्या हाती कधी पडणार, असा सवाल त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.अंधांच्या समस्या व शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अग्रेसर असणारे सतीश नवले यांनी अंध व्यक्ती हा समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने अशा विद्यार्थ्याला सहानुभूती दाखवून व त्यांच्यावर दया करून त्याला सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे. यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातून मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते. अंध व्यक्ती उत्पादक घटक बनल्यास पालकांना व समाजाला त्याचा भार वाटणार नाही. त्यांना जखडवून ठेवत अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)