शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ब्रेल लिपीला हवी आधुनिकतेची जोड

By admin | Updated: January 4, 2016 00:57 IST

शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक

चिंचवड : शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. ब्रेल लिपीने अंधांना दिशा दिली असली, तरीही या शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याशिवाय अंध बांधवांचे जीवन प्रकाशमय होणार नाही, असे मत अंध शिक्षणप्रणालीत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.अंध व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु यातील उदासीन धोरणांमुळे याची अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंध:कारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरीकाठी काठी अंधांच्या हाती कधी पडणार, असा सवाल त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.अंधांच्या समस्या व शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अग्रेसर असणारे सतीश नवले यांनी अंध व्यक्ती हा समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने अशा विद्यार्थ्याला सहानुभूती दाखवून व त्यांच्यावर दया करून त्याला सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे. यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातून मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते. अंध व्यक्ती उत्पादक घटक बनल्यास पालकांना व समाजाला त्याचा भार वाटणार नाही. त्यांना जखडवून ठेवत अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)