शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आठ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Updated: January 10, 2017 02:39 IST

स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य

भोर : स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणी शिक्षण या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळे भुतोंडे, गृहिणी, कुंबळे या ग्रामपंचायतींअंर्तगत असलेल्या ८ गावांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.याबबतचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रधान सचिव व पालमंत्र्यांना दिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुतोंडे, खुलशी-गृहिणी, चांदवणे, बोपे, कुंबळे, डेरे, खिळदेववाडी ही गावे आहेत. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही अद्याप जिल्हा मार्गासह अंर्तगत पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अनेक गावांत वाहन चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांत वाहने जात नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते. प्राथमिक शाळा आहेत; मात्र तेथे मुलांना शिकविण्यासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षकच नाहीत. या भागात शाळा मिळाली तर शिक्षक तेथे रुजूच होत नाहीत. कारण तेथे राहणे म्हणजे त्यांना मोठे संकट वाटते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत वारंवार मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत. वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो. तो चार महिने गायब असल्याने गावे अंधारातच राहतात. रात्रीअपरात्री घराबाहेर पडता येत नाही. मोबाईल टॉवर नसल्याने कोणत्याच मोबाईलला रेंज नसल्याने संर्पक होत नाही. काही काम असल्यास ५५ किलोमीटर दूर भोरला येण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही.येथील लोकांना उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्याने रोजगार हमी योजनेचे काम करून चार रुपये मिळविले जातात. मात्र, मोबाईल रेंज नसल्याने पोस्टाचे आॅनलाईन काम बंद राहते. रोजगार हमीवर काम करणाऱ्या लोकांना पैसे मिळत नसल्याचे भुतोंडेचे सरपंच संतोष उफाळे व कैलास रेणुसे यांनी सांगितले.वरील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आठ गावांतील नागरिकांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी उपसभापती भगवान कंक यांनी सांगितले.