शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

आठ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Updated: January 10, 2017 02:39 IST

स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य

भोर : स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणी शिक्षण या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळे भुतोंडे, गृहिणी, कुंबळे या ग्रामपंचायतींअंर्तगत असलेल्या ८ गावांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.याबबतचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रधान सचिव व पालमंत्र्यांना दिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुतोंडे, खुलशी-गृहिणी, चांदवणे, बोपे, कुंबळे, डेरे, खिळदेववाडी ही गावे आहेत. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही अद्याप जिल्हा मार्गासह अंर्तगत पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अनेक गावांत वाहन चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांत वाहने जात नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते. प्राथमिक शाळा आहेत; मात्र तेथे मुलांना शिकविण्यासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षकच नाहीत. या भागात शाळा मिळाली तर शिक्षक तेथे रुजूच होत नाहीत. कारण तेथे राहणे म्हणजे त्यांना मोठे संकट वाटते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत वारंवार मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत. वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो. तो चार महिने गायब असल्याने गावे अंधारातच राहतात. रात्रीअपरात्री घराबाहेर पडता येत नाही. मोबाईल टॉवर नसल्याने कोणत्याच मोबाईलला रेंज नसल्याने संर्पक होत नाही. काही काम असल्यास ५५ किलोमीटर दूर भोरला येण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही.येथील लोकांना उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्याने रोजगार हमी योजनेचे काम करून चार रुपये मिळविले जातात. मात्र, मोबाईल रेंज नसल्याने पोस्टाचे आॅनलाईन काम बंद राहते. रोजगार हमीवर काम करणाऱ्या लोकांना पैसे मिळत नसल्याचे भुतोंडेचे सरपंच संतोष उफाळे व कैलास रेणुसे यांनी सांगितले.वरील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आठ गावांतील नागरिकांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी उपसभापती भगवान कंक यांनी सांगितले.