शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाटलीबंद पाण्याचा अवैध धंदा जोरात

By admin | Updated: March 20, 2017 04:21 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच तहान भागण्यिासाठी थंड पाण्याची मागणी केली जाते. प्रवास अथवा बाजारात असेल तर बाटलीबंद

पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच तहान भागण्यिासाठी थंड पाण्याची मागणी केली जाते. प्रवास अथवा बाजारात असेल तर बाटलीबंद पाणी घेऊन तहान भागविली जाते. त्यामुळे काही दिवसांपासून बॉटल, २० लिटरचे जार यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची योग्य प्रक्रिया पार न पाडता पाणी बॉटल व जार सीलबंद करून, विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. भोसरी एमआयडीसी, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, सांगवी आदी परिसरामध्ये अनधिकृतपणे त्याचे उत्पादन सुरू आहे. दुकानदारांना या बाटल्या व जार स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांच्याकडूनही त्यालाच पसंती दिली जात आहे.पाणी बॉटल, जार यांचे उत्पादन करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारे प्लांट उभारणे, त्या प्लांटला अन्न व औषध प्रशासन (एफडीआय); तसेच बीएसआय मार्क मिळविणे आवश्यक असते. पाणी योग्यप्रकारे शुद्ध केले जाऊन त्याचा दर्जा चांगला, योग्य असल्याची तपासणी करूनच त्यांना पाणी बॉटल उत्पादनाचा परवाना दिला जातो; मात्र शहराच्या विविध भागांमध्ये एफडीआय व बीएसआय मार्कची कोणतीही परवानगी न घेता, पाणी शुद्धीकरण करण्याचे प्लांट उघडण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे उघडण्यात आलेल्या प्लांटमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यास फारसा खर्च केला जात नसल्याने त्यांच्याकडून अगदी स्वस्तामध्ये त्या दुकानदारांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. (वार्ताहर)