शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बोेरीबेलकरांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:09 IST

रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौैंड : रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रेल्वे प्रशासन ग्रामस्थांच्या जिवाची हमी घेत नाही तोपर्यंत रूळावरील मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखून धरली.सुरेश सूर्यवंशी (वय ६५), कार्तिक खळदकर (वय ३, दोघेही रा. बोरीबेल, दौंड) या दोघांचा यात मृत्यू झाला. हे दोघे रेल्वे रूळ ओलांडून गावात येत होते. भरधाव वेगाने मुंबईकडे धावणाºया उद्यान एक्स्प्रेसने चिरडले.ही घटना समजताच ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत रेल्वे प्रशासन रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल उभारण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. इंद्रायणी एक्स्प्रेस यामुळे सुमारे एक तास थांबून राहिली.काही वेळानंतर घटनास्थळी रेल्वेचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवासिंज बाविस्कर, रेल्वे सुरक्षा बलाचे सातपुते आले. त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. परिणामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने उद्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो मार्ग काढू, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे बोरीबेल गावावर शोककळा पसरली आहे.रेल्वे दुर्घटनेचा २0वा बळीबोरीबेल रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे फाटक नाही. गाव दोन विभागांत विस्तारीत झाले असल्याने गावात ये-जा करण्यासाठी नाईलाजास्तव रूळ ओलांडावे लागतात. गेल्या १0 वर्षांत १८ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या ३0 वर्षांपासून खासदार, आमदार, रेल्वे प्रशासनाकडे ग्रामस्थ सुरक्षेची मागणी करीत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. जर ३0 दिवसांत प्रशासनाने उपाययोजना केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.- हनुमंत पाचपुते, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ