शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

बोेरीबेलकरांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:09 IST

रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौैंड : रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रेल्वे प्रशासन ग्रामस्थांच्या जिवाची हमी घेत नाही तोपर्यंत रूळावरील मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखून धरली.सुरेश सूर्यवंशी (वय ६५), कार्तिक खळदकर (वय ३, दोघेही रा. बोरीबेल, दौंड) या दोघांचा यात मृत्यू झाला. हे दोघे रेल्वे रूळ ओलांडून गावात येत होते. भरधाव वेगाने मुंबईकडे धावणाºया उद्यान एक्स्प्रेसने चिरडले.ही घटना समजताच ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत रेल्वे प्रशासन रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल उभारण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. इंद्रायणी एक्स्प्रेस यामुळे सुमारे एक तास थांबून राहिली.काही वेळानंतर घटनास्थळी रेल्वेचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवासिंज बाविस्कर, रेल्वे सुरक्षा बलाचे सातपुते आले. त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. परिणामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने उद्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो मार्ग काढू, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे बोरीबेल गावावर शोककळा पसरली आहे.रेल्वे दुर्घटनेचा २0वा बळीबोरीबेल रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे फाटक नाही. गाव दोन विभागांत विस्तारीत झाले असल्याने गावात ये-जा करण्यासाठी नाईलाजास्तव रूळ ओलांडावे लागतात. गेल्या १0 वर्षांत १८ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या ३0 वर्षांपासून खासदार, आमदार, रेल्वे प्रशासनाकडे ग्रामस्थ सुरक्षेची मागणी करीत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. जर ३0 दिवसांत प्रशासनाने उपाययोजना केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.- हनुमंत पाचपुते, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ