शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बोेरीबेलकरांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:09 IST

रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौैंड : रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रेल्वे प्रशासन ग्रामस्थांच्या जिवाची हमी घेत नाही तोपर्यंत रूळावरील मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखून धरली.सुरेश सूर्यवंशी (वय ६५), कार्तिक खळदकर (वय ३, दोघेही रा. बोरीबेल, दौंड) या दोघांचा यात मृत्यू झाला. हे दोघे रेल्वे रूळ ओलांडून गावात येत होते. भरधाव वेगाने मुंबईकडे धावणाºया उद्यान एक्स्प्रेसने चिरडले.ही घटना समजताच ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत रेल्वे प्रशासन रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल उभारण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. इंद्रायणी एक्स्प्रेस यामुळे सुमारे एक तास थांबून राहिली.काही वेळानंतर घटनास्थळी रेल्वेचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवासिंज बाविस्कर, रेल्वे सुरक्षा बलाचे सातपुते आले. त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. परिणामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने उद्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो मार्ग काढू, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे बोरीबेल गावावर शोककळा पसरली आहे.रेल्वे दुर्घटनेचा २0वा बळीबोरीबेल रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे फाटक नाही. गाव दोन विभागांत विस्तारीत झाले असल्याने गावात ये-जा करण्यासाठी नाईलाजास्तव रूळ ओलांडावे लागतात. गेल्या १0 वर्षांत १८ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या ३0 वर्षांपासून खासदार, आमदार, रेल्वे प्रशासनाकडे ग्रामस्थ सुरक्षेची मागणी करीत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. जर ३0 दिवसांत प्रशासनाने उपाययोजना केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.- हनुमंत पाचपुते, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ