शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

बुकिंग आगाऊ; खरेदी मुहूर्तावर

By admin | Updated: October 27, 2016 05:10 IST

नवीन वाहनांच्या रोड टॅक्सच्या रकमेवर दोन टक्के सरचार्ज वाढला आहे़ सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने नवीन वाहन खरेदी करणा-या ग्राहकांच्या खिशाला

पिंंपरी : नवीन वाहनांच्या रोड टॅक्सच्या रकमेवर दोन टक्के सरचार्ज वाढला आहे़ सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने नवीन वाहन खरेदी करणा-या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. त्यामुळे अनेक शोरुमधारकांनी ग्राहकांकडून आगाऊ बुकींग करून घेऊन, दिवाळीतील मुहूर्तावरगाड्यांचे वितरण करण्याची शक्कल लढविली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ग्राहकांनी खरेदी केलेल्या नवीन वाहनांच्या डिझेल वाहनांवर ११ टक्के कर आकारला जातो़ पेट्रोल वाहनांवर ९ टक्के कर आकारला जातो़ तसेच १० लाखांच्या पुढे किं मत असणाऱ्या वाहनांवर १२ टक्के कर आकारला जातो़ दुचाकी खरेदी करताना एकदाच कर भरावा लागतो़ नवीन नियमाप्रमाणे आता त्या करावर सोमवारपासून दोन टक्के जादा अधिभार लागू झाला आहे़ गेल्या काही वर्षांच्या तुलनेत राज्यात वाहनांचा खरेदीचा आलेख वाढत चालला आहे़ वाहनांच्या वर्गवारीनुसार कर आकारण्याचे नियम परिवहन विभागाला आहेत़ शोरूमद्वारे वाहन खरेदीवेळी ग्राहकांकडून सर्व कर आकारले जातात़ दिवाळीच्या निमित्ताने शहरातील अनेक नागरिकांनी दुचाकी आणि वाहनांच्या अनेक शोरूमध्ये जादा अधिभार द्यावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे़ महागाई वाढत असताना त्यात शासनाकडून वाहनांच्या रोड टॅक्सच्या रकमेवर जादा कर आकारणीमुळे अनेकांनी या निर्णयाबद्दल रोष प्रकट केला आहे़ काहींना नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती असल्याने, कर चुकविण्यासाठी त्यांनी मागील महिन्यातच बुकिंग केले. (प्रतिनिधी)खरेदीदारांना फटका : २४ पासून अंमलबजावणीशासनाच्या आदेशाप्रमाणे रोड टॅक्स रकमेवर दोन टक्के अधिभार वाढला आहे़ त्याची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे़ बहुतांश बड्या किमतीच्या गाड्यांच्या रकमेवर वाढीव कराचा फ टका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.ग्राहकांना नाही पत्ताविशेषत: बँ्रड गाड्या घेणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फ टका बसला आहे़ त्यांना सुमारे दोन ते दहा हजारांचा जादा कर भरावा लागत असल्याचे सांगितले़ वाहनांची एकत्रित किंमत सांगितली जात असल्याने ग्राहकांना नवीन करवाढीचा पत्ता लागत नाही़ मात्र, गाडीच्या खर्चाचे विवरण पाहिल्यानंतर कर वाढल्याचे लक्षात येते़ नवीन वाहनांच्या रोड टॅक्स रकमेवर दोन टक्के अधिभार वाढल्यामुळे ग्राहक नाराज झाल्याची माहिती शोरूममालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़