शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निर्मलग्रामसाठीच बोगस नोंदी!

By admin | Updated: December 22, 2014 23:36 IST

निर्मलग्रामचा पुरस्कार मिळविण्यासाठीच वाकळवाडी (ता. खेड) येथे शौचालयाच्या बोगस नोंदी केल्याचे दिसून आले आहे.

वाफगाव : निर्मलग्रामचा पुरस्कार मिळविण्यासाठीच वाकळवाडी (ता. खेड) येथे शौचालयाच्या बोगस नोंदी केल्याचे दिसून आले आहे. मात्र, यामुळे जिल्ह्यातील निर्मलग्राम अभियानाच्या कामगिरीबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील राजगुरूनगरपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकळवाडीत शौचालयाच्या नोंदी बोगस झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी केली होती. शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत असल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल साकोरे यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने गावाला भेट दिली. यामध्ये भ्रष्टाचार नव्हे तर केवळ गावाला निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त व्हावा, यासाठीच या नोंदी केल्याचे दिसून आले आहे. याबाबत साकोरे म्हणाले, ‘‘ दारिद्रयरेषेखालील अथवा सर्व नियम व अटींना पात्र होणा-या कुटुंबांना शौचालय बांधकामासाठीचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. २ आॅक्टोबर २०१४ नंतर बांधण्यात आलेल्या अथवा येणा-या शौचालयांना प्रत्येकी बारा हजार रूपये अनुदान दिले जाईल. त्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवकांनी तातडीने विशेष ग्रामसभा लावून झालेल्या बोगस नोंदी रद्द करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. पात्र असलेल्या १०० कुटुंबांच्या यादीतील लाभार्थ्याने शौचालय बांधणे बंधनकारक आहे. ज्यांचे शौचालय पुर्ण झाले असेल, त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये संबंधित अनुदान जमा केले जाईल,. पथकामध्ये के. बी. नेहरे, सरपंच राजेश गुरव, गणपत पवळे, सिताराम वाळूंज, धमर्राज पवळे, अरूण पवळे, बाबाजी पवळे, ग्रामसेवक के. एन. खैरे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.या पथकाने वाकळवाडीतील गावठाण, उंबरमाळ (संभाजीनगर) येथील शौचालयांची स्थिती प्रत्यक्ष जाऊन पाहिली. ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर तपासण्यात आले. (वार्ताहर)