शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रक्त आटले

By admin | Updated: May 12, 2014 02:34 IST

यंदाच्या उन्हाळ्यात निवडणुकीच्या धामधुमीमुळे रक्तदान शिबिरेच होऊ न शकल्याने रक्ताची मागणी पुरविणार्‍या रक्तदात्यांची उणीव रक्तपेढ्यांना भासत आहे

पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात निवडणुकीच्या धामधुमीमुळे रक्तदान शिबिरेच होऊ न शकल्याने रक्ताची मागणी पुरविणार्‍या रक्तदात्यांची उणीव रक्तपेढ्यांना भासत आहे. ठरवून करावयाच्या अनेक शस्त्रक्रिया, ‘प्लॅन्ड सर्जरी’ सुट्ट्यांचा काळ पाहून केल्या जातात. उन्हाळ्यात दीर्घ सुट्टी मिळत असल्याने अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचे दिवस राखून ठेवलेले असतात; मात्र त्यासाठी आवश्यक रक्त याच काळात उपलब्ध होत नसल्याची खंत रक्तपेढ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यातील महाविद्यालयांच्या सुट्यांचा फटका दरवर्षी रक्तपेढ्यांना जाणवत असतो, यंदा निवडणुकीच्या आचारसंहितेची त्यातच भर पडली आहे. ऐनवेळच्या शस्त्रक्रिया, सिझर, अपघाताच्या रुग्णांना, थॅलेसेमिया आणि सिकलसेलच्या रुग्णांना तत्काळ रक्ताची आवश्यकता भासते. रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. ४मागणीनुसार रक्तपुरवठा व्हावा यासाठी बाराही महिने विविध महाविद्यालये, संस्था, आयटी क्षेत्रात रक्तदान शिबिरे राबविण्यात येतात. रक्ताचा साठा कितीही मुबलक असला तरी, रक्ताची मागणीही तितक्याच मोठ्या प्रमाणात होत असल्याने ‘बूंद जिंदगी’ देण्यासाठी शिबिरांचा आधार घेतला जातो. ऐच्छिक रक्तदान करणारे रक्तपेढ्यांवर येऊन रक्तदान करीत असतात. मात्र जनजागृती वाढून लोकांना सामाजिकदृष्ट्या उद्युक्त करण्यासाठी विविध ठिकाणी सामाजिक भूमिकेतून शिबिरे घेतली जातात. महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात शिबिरे होतात. मात्र उन्हाळ्यात ही परिस्थिती वेगळी ठरते.

आचार्य आनंदॠषीजी पुणे रक्तपेढीच्या हिना गुर्जर म्हणाल्या, महाविद्यालयांच्या सुट्ट्यांचा फटका रक्तपेढ्यांना दरवर्षी जाणवतो. शिबिरे घेऊ शकत नसल्याने कितीही रक्त उपलब्ध केले तरी मागणीइतका पुरवठा नसतो. त्यामुळे तुटवडा जाणवतोच. या दिवसांत प्लान्ड सर्जरी खूप होतात, त्यांना रक्तपुरवठा करावा लागतो आणि ऐनवेळची रक्ताची गरजही कायम असतेच. याच गोष्टीला केईएम रक्तपेढीच्या प्रतिनिधींनीही दुजोरा दिला.

उन्हाळ्यात लग्नसराईचाही काळ असल्याने स्थानिक बाहेरगावी तर बाहेरगावचे शहरात आलेले असतात. त्यामुळे शिबिरांना प्रतिसाद लाभत नाही. यंदा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिबिरेही होऊ शकली नाहीत. मागील १५ दिवसांपूर्वी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता; मात्र आता शिबिरांना सुरुवात होऊन पुरवठा पूर्ववत होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती रक्तपेढीच्या प्रतिनिधीने दिली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करण्यास कुणीही पुढे येत नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत ‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचा मोठा तुटवडा आहे.

उन्हाळ्यात रक्त दिल्यानंतर थकवा येतो, पुन्हा रक्त तयार होत नाही, रक्तदान केल्यानंतर दिवसभर काही काम जमत नाही आदी अनाठायी गैरसमजामुळे बहुतांश निरोगी लोक रक्तदान करत नाहीत. मात्र हे गैरसमज दूर करून रक्तदान केल्यास रुग्णांना जीवनदान मिळेल.