शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अंध शेतकरी नजरकैदेत

By admin | Updated: August 18, 2014 23:10 IST

पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे जलपूजन करीत असताना मागील दोन वर्षापासून 22 गावांच्या पाणी प्रश्नी लढणा:या अंध चंद्रकांत माणिक कदम यांना ‘पोलिसांच्या नजरकैदेत’ राहावे लागले.

बारामती : पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे जलपूजन करीत असताना मागील दोन वर्षापासून 22 गावांच्या पाणी प्रश्नी लढणा:या अंध चंद्रकांत माणिक कदम यांना ‘पोलिसांच्या नजरकैदेत’ राहावे लागले. 
कार्यक्रमापासून अवघ्या काही मीटर अंतरावर राहत असलेल्या कदम यांना गावाच्या शिवारात पाणी आल्याचा आनंद या नजरकैदेमुळे व्यक्त करता आला नाही. खुद्द त्यांनीच याबाबत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पुढा:यांनी माङयासारख्या अंध व्यक्तीबद्दल चुकीची माहिती दिली त्यामुळे हा प्रसंग ओढावला, असा आरोप त्यांनी केला.
जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी कदम यांचे घर गाठले. त्यावेळी त्यांनी सकाळी नऊ ते कार्यक्रम संपेर्पयत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. त्याचबरोबर नाराजी व्यक्त केली. याबाबत चंद्रकांत कदम म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून 22 गावांतील पाण्याचा प्रश्न घेऊन मी व माङयासारखे अनेक कार्यकर्ते लढले. माङयाप्रमाणोच मुर्टीचे नामदेव कारंडे हेदेखील अंधच आहेत. नवनाथ जगदाळे यांनी जिवाची बाजी लावली. ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. या योजनेचे पहिल्या टप्प्यात 4 गावांना पाणी येणार आहे. 
आंदोलन 22 गावांचे होते. त्यामुळे सर्वाना पाणी मिळाल्यावर गुढय़ा उभारून आनंद व्यक्त करू, अशी भूमिका ग्रामस्थांसमोर मांडली. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. मी सामान्य अंध व्यक्ती, माङयाकडून कोणत्याही प्रकारे कोणाला त्रस होणार नाही, अशी भूमिका असताना आज सकाळी 9 वाजता अचानक एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी घरी आले. वरिष्ठांचा आदेश आहे, कार्यक्रम संपेर्पयत कुठे जायचे नाही, असे सांगितले. त्यानुसार ते देखील घराच्या ओसरीतच थांबून राहिले. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पुढा:यांनी चुकीची माहिती दिल्याने हा प्रसंग ओढावला. या कार्यकत्र्यानी आमचा आजचा आनंद हिरावून घेतला. आम्हीदेखील नेत्यांवर प्रेम करणारे आहोत. आम्हाला कार्यक्रमाला बोलावले असते तर उर्वरित गावांच्या पाणी प्रश्नी मागणी केली असती. परंतु, या कार्यक्रमापासूनच आम्हाला वंचित ठेवले. इतर 16 गावांच्या पाणी प्रश्नाला विलंब लागल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारून लढा देऊ. माझा लढा या भागातील जनतेसाठी कायम राहील. मात्र, आजच्या प्रकाराने मी व माङो कुटुंब थक्क झालो. बारामतीसारख्या तालुक्यात आनंदाच्या कार्यक्रमात नजरकैदेत राहावे लागते, यासारखी दुर्दैवाची बाब नाही.
- चंद्रकांत कदम 
अंध शेतकरी