शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: March 14, 2016 01:19 IST

अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला

नसरापूर : अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला. सक्षम अधिकाऱ्याने मनात आणल्यानंतर काय बदल होऊ शकतो, याचा प्रत्यय आज नसरापूरकरांना आला. पोलिसांच्या या प्रयत्नाला आज कोंडी सोडविण्यात यश आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.नसरापूर बाजारपेठेत अनेक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी व समस्या मोठ्या प्रमाणात आ वासून उभ्या आहेत. वाहतुकीची समस्या ग्रामस्थ व पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यात नेहमी अपयशच पदरात पडते. शनिवारी (दि. १२ रोजी) नसरापूर बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थ व राजगड पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या वेळी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्याचे नवनियुक्तपोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, ग्रा.पं.सदस्य संदीप कदम, विक्रम कदम, आजी-माजी सरपंच, पदाधिकारी, व्यापारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राजगड पोलीस नसरापूर बाजारपेठेत येऊन संबंधितांशी संवाद साधत अडथळे दूर करीत होते. नसरापूरकरांबरोबर झालेल्या बैठकीची अंमलबजावणी पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी केलेल्या आवाहनाला ताबडतोब प्रतिसाद देऊन नसरापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वत:हून अडथळे दूर केले; मात्र तरीही वाहतुकीची समस्या बेजबाबदार वाहनांमुळे सुटू शकली नाही. याकरिता संबंधित बैठकीचे आयोजन पोलिसांनी केल्याचे समजते. (वार्ताहर)