शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

शेतकऱ्यांकडे काळा पैसा येणार कुठूून?

By admin | Updated: November 14, 2016 06:51 IST

काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर अधिक प्रभावी होऊ शकेल. आजच्या व्यवस्थेमुळे

पुणे : काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर अधिक प्रभावी होऊ शकेल. आजच्या व्यवस्थेमुळे आणि व्यवस्थेतील चुकांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच राहत नाही, तर काळा पैसा कुठून येणार? असा प्रश्न अभिनेते, नाम फाउंशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला़ भ्रष्टाचाऱ्याचा काळा पैसा शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी नाम फाउंडेशनला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला़ त्यावेळी ते बोलत होते. कोहीनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, मयूरेश वैद्य, नैनिश देशपांडे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली.अनासपुरे म्हणाले, ‘‘भरपूर पाऊस झाला म्हणून आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असे होणार नाही. चुकीची धोरणे आणि त्याची चुकीची अंमलबजावणी यामुळे वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. साहेबी संस्कृतीमुळे व्यवस्था शेतकऱ्यापासून लांब गेली. या साहेबी संस्कृतीनेच शेतकऱ्यांची आज अवस्था वाईट झाली आहे़ शेतकऱ्यांच्या समस्या तात्कालिक नाहीत. त्यामुळे त्याच्यावर केवळ मलमपट्टी करणारे तत्कालिक उपाय करुन चालणार नाहीत, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे. नामच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न करीत आहोत. हे काम करताना आम्ही साहेबी संस्कृती लांब ठेवली. आम्हाला आमच्या या कामाचे क्रेडिट नको, आम्ही इतरांसारखेच सर्वसामान्य आहोत, आम्हाला कोणीही देवदूत समजू नये.’’