शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भाजपचा उद्दामपणा नडला

By admin | Updated: May 1, 2015 01:05 IST

संसदेच्या अधिवेशनात सहापैकी पाच विधेयके संमत झाली; मात्र भाजपच्या उद्दामपणामुळेच जमीन अधिग्रहण कायद्याचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

पुणे : संसदेच्या अधिवेशनात सहापैकी पाच विधेयके संमत झाली; मात्र भाजपच्या उद्दामपणामुळेच जमीन अधिग्रहण कायद्याचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. विरोधक म्हणजे काही सरकारचे नोकर नाहीत. मालक असल्यासारखे त्यांच्याशी वागण्याऐवजी मैत्रीचा हात पुढे करायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती राहुलकुमार बजाज यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब आॅफ पुणे टिळक रोड आणि पूना मिडटाऊन या संस्थेने आयोजित केलेल्या व्ही. के. ऊर्फ अप्पासाहेब सावळे स्मृती व्याख्यानात ‘अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन’ हा त्यांच्या विषय होता. रोटरीचे पदाधिकारी सुबोध जोशी, संजय बापट, किशोर माने व्यासपीठावर होते. बजाज म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष विरोधात असताना अनेक वेळा गोंधळ घालत होता. सरकार चालविणे ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच आहे. त्यामुळे भाजपने विरोधकांना सन्मानाने वागणूक देऊन कामकाज चालविले पाहिजे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्याकडील सरकारी नोकरशाहीच्या कामाचा दर्जा खासगी क्षेत्रापेक्षा चांगले पगार असूनही अत्यंत सुमार आहे. आपल्या देशात एकूणच हक्कांची जाणीव अधिक व जबाबदारीची जाणीव कमी आहे. मागणी वाढली, गुंतवणूक वाढली तर उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकेल. समाजवादी औद्योगिक धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने समाजवाद राबविला गेल्याने काही मूठभर राजकारणी आणि उद्योगपतींचे कल्याण झाले. १९७० ते ९०च्या काळात भ्रष्ट पद्धतीचे व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेमुळे आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले. आपली लोकशाही हे आपले सर्वांत मोठे बळ आहे. देशातील मध्यमवर्गाला प्रगतीची आस आहे. तेच देशाचे आशास्थान असून उज्ज्वल भवितव्यासाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही. ’’बजाज म्हणाले, ‘‘एअर इंडिया कंपनी बंद पडली, तरी देशाचे काही नुकसान होणार नाही. एअर इंडिया फक्त कामगारांसाठी चालविली जात आहे. ही कंपनी बंद पडू नये यासाठी कामगार संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी संप केला, तर अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल; त्यामुळे सरकारला हा प्रश्न काळजीने सोडवावा लागत आहे.’’ रोटरीचे पदाधिकारी चारू भावे यांनी प्रास्ताविक केले. मराठा चेंबरचे संचालक अनंत सरदेशमुख यांनी बजाज यांचा परिचय करून दिला.(प्रतिनिधी)४आपण गांधीवादी घराण्यातून आलो आहोत. एखाद्या नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याची भाषा या देशात होणार असेल, तर आपले रक्त खवळून उठल्याशिवाय राहणार नाही, असे बजाज म्हणाले.