शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव करत आहे. परंतु, राज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुडाचा बदला घेण्याची भावना महाराष्ट्रात कधी नव्हती. अशी चुकीची परंपरा घातक ठरणारी आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामधाम येथे मंगळवारी (दि. ३१) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या वेळी इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतले सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून न्याय मिळावा म्हणून शेतकरी झगडत आहेत. मात्र केंद्र सरकार अद्यापि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रचंड प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार आहे. देश विकण्याचा धंदा केंद्र सरकारने चालवला आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. आमचे विरोधक मागील काही दिवसांत आशीर्वाद घेण्याच्या नावाखाली फिरले. परंतु हा आशीर्वाद घेण्याअगोदर पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाहीत, असा सवाल या वेळी करत, आम्ही ओबीसींना, भटक्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसच्या माध्यमातून कायमची ठेवली आहे. ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात राज्यात व देशात आहे. त्यांचा सातत्याने सुधारात्मक विचार करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशीही अपेक्षा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

चौकट :

इंदापूरची विधानसभेची जागा आम्ही सोडणार नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्ही काही इंदापूरची विधानसभा सोडणार नाही. सध्या राज्यात काँग्रेस पक्षालाच जोरदार पाठिंबा मिळतो आहे. पुढच्या विधानसभेला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नंबर एक राहील, अशीही माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

फोटो ओळ : इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व मान्यवर.