शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजपाची दुटप्पी भूमिका

By admin | Updated: August 9, 2016 01:39 IST

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे.

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, जलवाहिनी पूर्णत: रद्द करणे आदींविषयी केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. विरोधात असणारी भाजपा सत्तेत आली, तरी मावळवासीयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्यासाठी झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केल्याने तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही. मतांच्या राजकारणासाठी मावळ आणि पिंपरी-चिंचवडवासीयांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. मावळवासीयांच्या हृदयावरील भळभळती जखम गेल्या पाच वर्षांपासून तशीच आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली. या वेळी बंदिस्त वाहिनीतून पाणी नेऊ नये, अशी मागणी मावळवासीयांची होती. बंदिस्त वाहिनीतून पाणी नेले, तर शेतीला पाणी मिळणार नसल्याची भावना मावळवासीयांची झाली. आणि त्यातच तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ‘असे अनेक विरोध आम्ही मोडून काढले आहेत’ असे विधान केल्याने या विषयाला वेगळे वळण मिळाले. राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा आणि इतर पक्ष असे वातावरण तयार झाले. याच ठिकाणी राष्ट्रवादीचा फाजील आत्मविश्वास अंगलट आला. मावळातील शेतकऱ्यांनी जलवाहिनीविरोधात आंदोलन सुरू केले. याचा शेवट बऊर येथील गोळीबाराने झाला. त्यात तीन शेतकरी शहीद झाले. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलवाहिनीच्या कामास स्थगिती दिली. या घटनेनंतर शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. अटकसत्रही सुरू झाले. चौकशी समिती नेमली गेली. गोळीबारास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. त्यानंतर २०१४ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द करू, असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. दोन वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत आहे. (प्रतिनिधी)