शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

भाजपाची दुटप्पी भूमिका

By admin | Updated: August 9, 2016 01:39 IST

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे.

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, जलवाहिनी पूर्णत: रद्द करणे आदींविषयी केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. विरोधात असणारी भाजपा सत्तेत आली, तरी मावळवासीयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्यासाठी झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केल्याने तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही. मतांच्या राजकारणासाठी मावळ आणि पिंपरी-चिंचवडवासीयांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. मावळवासीयांच्या हृदयावरील भळभळती जखम गेल्या पाच वर्षांपासून तशीच आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली. या वेळी बंदिस्त वाहिनीतून पाणी नेऊ नये, अशी मागणी मावळवासीयांची होती. बंदिस्त वाहिनीतून पाणी नेले, तर शेतीला पाणी मिळणार नसल्याची भावना मावळवासीयांची झाली. आणि त्यातच तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ‘असे अनेक विरोध आम्ही मोडून काढले आहेत’ असे विधान केल्याने या विषयाला वेगळे वळण मिळाले. राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा आणि इतर पक्ष असे वातावरण तयार झाले. याच ठिकाणी राष्ट्रवादीचा फाजील आत्मविश्वास अंगलट आला. मावळातील शेतकऱ्यांनी जलवाहिनीविरोधात आंदोलन सुरू केले. याचा शेवट बऊर येथील गोळीबाराने झाला. त्यात तीन शेतकरी शहीद झाले. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलवाहिनीच्या कामास स्थगिती दिली. या घटनेनंतर शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. अटकसत्रही सुरू झाले. चौकशी समिती नेमली गेली. गोळीबारास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. त्यानंतर २०१४ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द करू, असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. दोन वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत आहे. (प्रतिनिधी)