शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

भाजपाची दुटप्पी भूमिका

By admin | Updated: August 9, 2016 01:39 IST

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे.

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात एक, अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, जलवाहिनी पूर्णत: रद्द करणे आदींविषयी केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. विरोधात असणारी भाजपा सत्तेत आली, तरी मावळवासीयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्यासाठी झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केल्याने तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही. मतांच्या राजकारणासाठी मावळ आणि पिंपरी-चिंचवडवासीयांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. मावळवासीयांच्या हृदयावरील भळभळती जखम गेल्या पाच वर्षांपासून तशीच आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली. या वेळी बंदिस्त वाहिनीतून पाणी नेऊ नये, अशी मागणी मावळवासीयांची होती. बंदिस्त वाहिनीतून पाणी नेले, तर शेतीला पाणी मिळणार नसल्याची भावना मावळवासीयांची झाली. आणि त्यातच तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ‘असे अनेक विरोध आम्ही मोडून काढले आहेत’ असे विधान केल्याने या विषयाला वेगळे वळण मिळाले. राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा आणि इतर पक्ष असे वातावरण तयार झाले. याच ठिकाणी राष्ट्रवादीचा फाजील आत्मविश्वास अंगलट आला. मावळातील शेतकऱ्यांनी जलवाहिनीविरोधात आंदोलन सुरू केले. याचा शेवट बऊर येथील गोळीबाराने झाला. त्यात तीन शेतकरी शहीद झाले. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलवाहिनीच्या कामास स्थगिती दिली. या घटनेनंतर शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. अटकसत्रही सुरू झाले. चौकशी समिती नेमली गेली. गोळीबारास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. त्यानंतर २०१४ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द करू, असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. दोन वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत आहे. (प्रतिनिधी)