शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांना भाजपाने देशोधडीला लावले

By admin | Updated: May 12, 2017 04:48 IST

देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले अन् आता शेतकऱ्यांनी तुरीचे भरघोस उत्पादन काढले, तर शेतकऱ्यांना साले म्हणत अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध केला. शिवसेना सरकारमध्ये जरी असली तरी सरकारजमा झाली नसल्याचे सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन कोरेगाव भीमा येथे करण्यात आले. याप्रसंगी राम गावडे बोलत होते. या वेळी आयोजक उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख नगरसेवक संजय देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख, आनंदा हजारे, बापू मासळकर, आबा ढेरंगे, मयूर थोरात, नवनाथ भंडारे, युवासेनेचे विभागप्रमुख अभिजित चव्हाण, प्रकाश काशिद, सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, वैभव ढोकले आदी उपस्थित होते.राम गावडे म्हणाले की, सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी, कामगारवर्गाला सुगीचे दिवस येतील म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र तीन वर्षांत सरकारने कोणतेच ठोस निर्णय तर घेतले नाहीतच उलट कामगार, सोनार, डॉक्टर यांच्या विरोधात निर्णय घेताना शेतकऱ्यालाही देशोधडीला लावले आहे. पंतप्रधानांनी भरघोस उत्पादन शेतात काढा, सर्व शेतमाल सरकार खरेदी करेल असे सांगूनही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एक लाख टन तूरडाळ खरेदी केल्याचे सांगतात. मात्र शिल्लक किती तूरडाळ आहे याचा विचार कोण करणार? असा प्रश्न आहे.भाजपाच्या काळात रोज किमान दहा शेतकरी आत्महत्या करत असूनही भाजपाचे नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत यशवंत कारखाना चालू करतो म्हणणाऱ्यांनी फक्त भाजपाचे संचालक निवडण्यापलीकडे कोणतेच काम केले नाही, ग्रामस्थांचा विरोध असूनही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कचरा प्रकल्प टाकण्याचा डाव आखला आहे, अशा प्रत्येक क्षेत्रात भाजपाने नागरिकांच्या विरोधी भूमिका घेत असल्याने अशा भाजपाचा निषेध या वेळी केला.