शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

शेतकऱ्यांना भाजपाने देशोधडीला लावले

By admin | Updated: May 12, 2017 04:48 IST

देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले अन् आता शेतकऱ्यांनी तुरीचे भरघोस उत्पादन काढले, तर शेतकऱ्यांना साले म्हणत अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध केला. शिवसेना सरकारमध्ये जरी असली तरी सरकारजमा झाली नसल्याचे सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन कोरेगाव भीमा येथे करण्यात आले. याप्रसंगी राम गावडे बोलत होते. या वेळी आयोजक उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख नगरसेवक संजय देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख, आनंदा हजारे, बापू मासळकर, आबा ढेरंगे, मयूर थोरात, नवनाथ भंडारे, युवासेनेचे विभागप्रमुख अभिजित चव्हाण, प्रकाश काशिद, सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, वैभव ढोकले आदी उपस्थित होते.राम गावडे म्हणाले की, सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी, कामगारवर्गाला सुगीचे दिवस येतील म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र तीन वर्षांत सरकारने कोणतेच ठोस निर्णय तर घेतले नाहीतच उलट कामगार, सोनार, डॉक्टर यांच्या विरोधात निर्णय घेताना शेतकऱ्यालाही देशोधडीला लावले आहे. पंतप्रधानांनी भरघोस उत्पादन शेतात काढा, सर्व शेतमाल सरकार खरेदी करेल असे सांगूनही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एक लाख टन तूरडाळ खरेदी केल्याचे सांगतात. मात्र शिल्लक किती तूरडाळ आहे याचा विचार कोण करणार? असा प्रश्न आहे.भाजपाच्या काळात रोज किमान दहा शेतकरी आत्महत्या करत असूनही भाजपाचे नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत यशवंत कारखाना चालू करतो म्हणणाऱ्यांनी फक्त भाजपाचे संचालक निवडण्यापलीकडे कोणतेच काम केले नाही, ग्रामस्थांचा विरोध असूनही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कचरा प्रकल्प टाकण्याचा डाव आखला आहे, अशा प्रत्येक क्षेत्रात भाजपाने नागरिकांच्या विरोधी भूमिका घेत असल्याने अशा भाजपाचा निषेध या वेळी केला.