शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शेतकऱ्यांना भाजपाने देशोधडीला लावले

By admin | Updated: May 12, 2017 04:48 IST

देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले अन् आता शेतकऱ्यांनी तुरीचे भरघोस उत्पादन काढले, तर शेतकऱ्यांना साले म्हणत अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध केला. शिवसेना सरकारमध्ये जरी असली तरी सरकारजमा झाली नसल्याचे सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन कोरेगाव भीमा येथे करण्यात आले. याप्रसंगी राम गावडे बोलत होते. या वेळी आयोजक उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख नगरसेवक संजय देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख, आनंदा हजारे, बापू मासळकर, आबा ढेरंगे, मयूर थोरात, नवनाथ भंडारे, युवासेनेचे विभागप्रमुख अभिजित चव्हाण, प्रकाश काशिद, सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, वैभव ढोकले आदी उपस्थित होते.राम गावडे म्हणाले की, सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी, कामगारवर्गाला सुगीचे दिवस येतील म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र तीन वर्षांत सरकारने कोणतेच ठोस निर्णय तर घेतले नाहीतच उलट कामगार, सोनार, डॉक्टर यांच्या विरोधात निर्णय घेताना शेतकऱ्यालाही देशोधडीला लावले आहे. पंतप्रधानांनी भरघोस उत्पादन शेतात काढा, सर्व शेतमाल सरकार खरेदी करेल असे सांगूनही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एक लाख टन तूरडाळ खरेदी केल्याचे सांगतात. मात्र शिल्लक किती तूरडाळ आहे याचा विचार कोण करणार? असा प्रश्न आहे.भाजपाच्या काळात रोज किमान दहा शेतकरी आत्महत्या करत असूनही भाजपाचे नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत यशवंत कारखाना चालू करतो म्हणणाऱ्यांनी फक्त भाजपाचे संचालक निवडण्यापलीकडे कोणतेच काम केले नाही, ग्रामस्थांचा विरोध असूनही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कचरा प्रकल्प टाकण्याचा डाव आखला आहे, अशा प्रत्येक क्षेत्रात भाजपाने नागरिकांच्या विरोधी भूमिका घेत असल्याने अशा भाजपाचा निषेध या वेळी केला.