शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भाजपसह, सेना, काँग्रेसने सोडल्या जागा !

By admin | Updated: February 8, 2017 02:54 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक गट-गणांमध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक गट-गणांमध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस आणि शिवसेनेला अनेक ठिकाणी उमेदवारच मिळालेले नाहीत. एका बाजूला राज्यामधील परिस्थिती आणि राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली आहे आणि त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व ठिकाणी उमेदवार देणे त्यांना शक्य झालेले दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये उमेदवारच देता आले नसतील तर आव्हान तरी कसे उभे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस पक्षांकडे उमेदवारांची संख्या वाढली आहे. काँगे्रसच्या वतीने मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या केवळ २५ जागांवर उमेदवार दिले होते. या वेळी ही संख्या ६० पर्यंत गेली आहे.जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता आहे. या वेळी प्रथमच भाजपानेही ग्रामीण भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोर लावला आहे. केवळ एक दोन-तालुक्यांत अस्तित्व असलेल्या भाजपाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने राष्ट्रवादी, शिवसेनेतील काही बंडखोर उमेदवारांना पक्षात घेऊन उमेदवार देण्याची तयारी केली होती. सर्वच पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता गुप्त पद्धतीने शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले. यामुळे बंडखोरी रोखण्यात चांगले यश आले. मात्र भाजपाला अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७५ जागांपैकी ७ जागांवर पक्षाकडे अधिकृत उमेदवार नाहीत. तर पंचायत समितीच्या १५० जागांपैकी १३ जागांवर भाजपाला उमेदवार मिळालेले नाहीत. काँग्रेसने ७५पैकी ६० जागांवर व पंचायत समितीच्या १५० जागांपैकी ९५ जागांवर पक्षाचे अधिकृत उमेदवार दिले आहेत. जिल्हा परिषदेसह अनेक पंचायत समित्यांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता आहे. यामुळे आमच्या पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. जिल्हा परिषदेच्या ७५ आणि पंचायत समितीच्या १५० जागांवर राष्ट्रवादी काँगे्रसने सक्षम उमेदवार दिले आहेत. परंतु विरोधकांना जिल्ह्यात अनेक जागांवर उमेदवारदेखील मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रससाठी चांगले वातावरण आहे.- जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस महापालिकेमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतदेखील आघाडी होणार अशी चर्चा होती. परंतु जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रस हाच आमचा मुख्य विरोधक असून, पक्षाचे जिल्ह्यातील नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपट, ज्येष्ठ नेते नाना नवले आम्ही एकत्र बसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देण्यात आले असून, काँगे्रसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतील.- संजय जगताप, जिल्हाध्यक्ष काँगे्रस