शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पक्षांचे महत्त्व कमी करण्याचा भाजपाचा अजेंडा

By admin | Updated: December 11, 2015 01:01 IST

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात राजकारण झाले असल्याची भारतीय जनता पक्षाची टीका खरीच असल्याचे काँग्रेस,

पुणे : स्मार्ट सिटीचा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात राजकारण झाले असल्याची भारतीय जनता पक्षाची टीका खरीच असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या तिन्ही पक्षांचे नेते खासगीत सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रकारे कंपनीराज निर्माण करून प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी करीत त्यांना संपवून टाकण्याचा व केंद्रीय वर्चस्व निर्माण करण्याचा छुपा अजेंडा या देशस्तरावर जाहीर झालेल्या योजनेमागे असल्याचे या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.या मताच्या पुष्टीसाठी त्यांच्यातील काही जणांनी स्मार्ट सिटीसाठी खास कंपनी स्थापन करण्याच्या तरतुदीकडे लक्ष वेधले. या कंपनीची रचना वरवर पाहता सगळे काही महापालिकाच ठरवणार, अशी असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कंपनीच्या संचालक मंडळावर कोणाला घ्यायचे, याचे जे नियम दिलेले आहेत त्यात स्पष्ट म्हटले आहे, की ज्या पक्षांची सदस्यसंख्या १० पेक्षा जास्त आहे त्या पक्षांना त्यावर प्रतिनिधित्व मिळेल. अशाने लहान पक्षांना कंपनीत स्थान असणार नाही, हे उघड आहे. १५ जणांच्या संचालक मंडळात फक्त ६ जणच लोकनियुक्त प्रतिनिधींपैकी असतील. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते व या तीन जणांच्या पक्षांव्यतिरिक्त अन्य तीन पक्षांचे नेते (ज्यांची सदस्य संख्या १० पेक्षा जास्त आहे असे) असतील. अन्य सर्व संचालक सरकारी अधिकारीच असून, त्यात एक जण केंद्र सरकारचा प्रतिनिधीही असणार आहे. यावरून कंपनीच्या कामकाजात पालिकेचा सहभाग किती असेल, ते स्पष्ट दिसते, असे विरोधकांचे मत आहे.पालिकेचे रिकामे भूखंड कंपनीकडे हस्तांतरित करायचे आहेत. ते भाडेतत्त्वावर देण्याची, त्यावर व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याची मुभा आहे. कंपनीला विविध उपक्रमांसाठी प्रमुख अधिकारी नियुक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. असे अनेक आक्षेपार्ह मुद्दे या कंपनीच्या रचनेत आहे व आयुक्तांनी ते कधीही नगरसेवकांपुढे उघड केले नाहीत. यावर कसलीही जाहीर चर्चा होऊ नये, अशीच त्यांची अपेक्षा असल्याची शंका येणे गैर नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे.पालिकांची कर्मचारी यंत्रणा असताना पुन्हा कंपनीच्या माध्यमातून कर्मचारी निर्माण करणे यात नोकरशाही आणून पालिकांचे अधिकार कमी करण्याचा डाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. योजनेचे कसलेही स्पष्ट चित्र नगरसेवकांसमोर उभे राहू नये, याचीच काळजी केंद्र सरकारने घेतली. त्यामुळेच यात राजकारण असलेच तर ते भाजपाचेच आहे, असे कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.