शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बिवरी - कोरेगाव मूळ बंधारा जलपर्णीमुळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडला जावून तो या बंधाऱ्याला नुकसान करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडणार ...

जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडला जावून तो या बंधाऱ्याला नुकसान करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. पावसाच्या पाण्यामुळे मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बिवरी - कोरेगाव मूळ येथील बंधारा पाण्याखालीच जाणार नाही तर पाण्याच्या दाबाने वाहून जाण्याची भीती बिवरीचे माजी उपसरपंच सुनील गोते व कोरेगाव मूळचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे यांनी व्यक्त केली.

या बंधाऱ्याला कठडे नसल्याने अपघात होऊन कोणी या पाण्यात वाहून गेला का? जलपर्णीत गुंतून बुडून गतप्राण झाला हे पण कळणार नाही, अशी अवस्था झाली आहे. बंधाऱ्यावरील रस्त्याच्या पृष्ठ भागातील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत, त्यामुळे पण मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत पाटबंधारे खात्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बिवरी-कोरेगाव मूळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या जवळील नदीपात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी व झाडेझुडपे वाढल्याने व मुळातच ताकद कमी झालेल्या बंधाऱ्याचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या बंधाऱ्यावरून जाणारे विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांची अडचण होणार आहे. बिवरी, शिरसवडी, अष्टापूर येथील रहिवाशांना उरुळी कांचन येथे येण्यासाठी भवरापूर येथील पुलाचा वापर करावा लागणार असल्याने सुमारे १० ते १२ किलोमीटरच्या अंतराचा वळसा घालावा लागणार आहे.