शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण समृद्ध जुन्नरमधील जैवविविधता संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST

खोडद : जुन्नर तालुका समृद्ध जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरात असलेली विविध जैवविविधता हे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण आहे. विविध ...

खोडद : जुन्नर तालुका समृद्ध जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरात असलेली विविध जैवविविधता हे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण आहे. विविध अभ्यासकांनी आणि संशोधकांनी जुन्नरच्या भूमीत पर्यावरणासाठी काम करत आजवर हा समृद्ध नैसर्गिक ठेवा जपला आहे. परंतु, तरीही गेली काही वर्षांपासून पर्यटनाच्या व विकासाच्या नावाखाली जंगलांचं कधीही न भरून येणारे असे नुकसान वनसंपत्तीचे होत आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाचे महत्व अधिकच अधोरेखित होत आहे.

आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने वृक्षलागवड करून आपण निसर्गाची जी हानी केली आहे, ती भरून येणारी नाही. त्यासाठी आपल्याला आधुनिक पद्धतीने मग जपानमध्ये विकसित झालेले मियावाकी तंत्रज्ञान किंवा सीड बोल ट्री प्लांटेशन अशा पद्धतीने अति घन जंगले निर्माण करावी लागतील. त्याचा नैसर्गिक समतोल साधण्यासाठी मानवी हस्तक्षेपापासून ही दूर ठेवावी लागतील. पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती फक्त आणि फक्त जंगलांच्या माध्यमातूनच भूगर्भात साठविणे शक्य आहे आणि ते साठवले नाही तर भविष्यात पाणी आटून जाईल आणि खूप मोठे कधीही भरून न येणारे संकट आपल्यासमोर उभे राहील. पर्यावरण संवर्धनासाठी संवर्धन चळवळी उभ्या राहाव्या लागतील. तालुक्यातून राज्य, देश आणि आंतराष्ट्रीय पातळीवर निसर्गप्रेमी आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन संवर्धनाचं महत्व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी गावोगावी तज्ज्ञांनी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करता येऊ शकते. लोकसहभाग आणि प्रशासनाची जोड मिळाल्यास दृश्य स्वरूपातील बदल आपल्याला दिसून येऊ शकतो.

पर्यटनाचा व निसर्ग सहलींचा होणारा अतिरेक नियंत्रणात आणण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न न झाल्यास निसर्गाच्या रौद्र रुपास संपूर्ण जगास सामोरे जावे लागेल असे सर्वच शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामध्ये संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो. अतिवृष्टी, ओला व कोरडा दुष्काळ, वादळं, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, भूस्खलन सारखे प्रकार अधिक तीव्र व वेगाने होऊ शकतात असा इशारा दिला आहे. ही वेळ या सगळ्याकडे गांभीर्याने पाहण्याची आहे. नाहीतर आपली वाटचाल विकासाच्या कमी आणि विनाशाच्या दिशेने अधिक वेगाने होईल यात शंका नाही." असे खोडद येथील वनस्पती व निसर्ग अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले.

कोट

"या प्रवासात पुढचं पाऊल म्हणून आपल्याला शासनदरबारी सातत्याने निसर्गस्नेही विकासाचा आग्रह धरावा लागेल. एक वेळ विकास थोडा मंदावला, तरी चालेल पण विनाशाचे धनी होता कामा नये हे पटवून द्यावं लागेल. यामध्ये सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन दबावगट तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. जुन्नरमध्ये हा बदल देश नव्हे, तर आंतराष्ट्रीय पातळीवर एक उत्तम उदाहरण आपण या माध्यमातून घालून देऊ शकू यात शंका नाही, फक्त सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे."

- राजकुमार डोंगरे, वनस्पती व पर्यावरण अभ्यासक, खोडद