शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

भीमेवरील बंधारे तुडुंब

By admin | Updated: May 13, 2014 02:38 IST

भामा-आसखेड धरणाचे पाणी ८५० क्युसेक्सने सोडण्यात आल्याने भीमा नदीवरील विठ्ठलवाडीपर्यंतचे बंधारे पाण्याने भरले आहेत.

तळेगाव ढमढेरे : भामा-आसखेड धरणाचे पाणी ८५० क्युसेक्सने सोडण्यात आल्याने भीमा नदीवरील विठ्ठलवाडीपर्यंतचे बंधारे पाण्याने भरले आहेत. दि. १९ मेपर्यंत उर्वरित आलेगाव पागापर्यंतचे बंधारे भरले जाणार आहेत. या पाण्यामुळे शिरूर, दौंड, हवेली तालुक्यांतील १४ हजार हेक्टर क्षेत्रास ऐन उन्हाळ्यातही पाणी पुरणार असल्याचे कोंढापुरी येथील पाटबंधारे शाखा अधिकारी जे. डी. संकपाळ यांनी सांगितले. पाण्याची गरज लक्षात घेता तिसरे आवर्तन भामा-आसखेड धरणातून ८५० क्युसेक्सने ५ मेपासून भीमा नदीत सोडण्यात आले आहे. िशरूर-हवेली तालुक्यातील वढू बुद्रुक १६१, पेरणे ९२, बुरकेगाव ७३, सांगवी सांडस-विठ्ठलवाडी ९९ दशलक्ष फूट क्षमतेचे बंधारे या पाण्याने भरले असून, पाटेठाण ८६, शिवतक्रार म्हाळुंगी १४५, वडगाव बांडे ४२ व आलेगाव पागा १५८ दशलक्ष फूट क्षमतेचे शिरूर-दौंड तालुक्यांतील बंधारे १९ मेपर्यंत भरले जाणार आहेत. यामुळे शिरूर, हवेली, दौंड तालुक्यांतील भीमा नदीकाठालगतचे सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यातील जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. भामा-आसखेड धरणात पाण्याचा साठा साधारण ६० टक्के उपलब्ध आहे. पावसाळा लांबल्यास गरज पडली तर चौथे आवर्तन सोडण्याची तरतूद आहे. शिरूर, हवेली, दौंड तालुक्यांना वरदान ठरणार्‍या भीमा नदीवरील आठ बंधार्‍यांमध्ये एकूण पाणीसाठा २५ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. त्यामुळे सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक शेतकरी घेत आहे. (वार्ताहर)