शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पुण्यासाठी भामा-आसखेडचे पाणी : पोलीस फौजफाट्यात जॅकवेलचे काम सुरू, धरणग्रस्तांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 06:07 IST

धरणग्रस्तांचा मोठा विरोध असल्याने अडीच महिन्यांपासून बंद असलेले भामा-आसखेड धरणातील जॅकवेलचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले.

आसखेड /पुणे : धरणग्रस्तांचा मोठा विरोध असल्याने अडीच महिन्यांपासून बंद असलेले भामा-आसखेड धरणातील जॅकवेलचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती. या योजनेतून पुण्यासाठी अतिरिक्त पाणी मिळणार आहे.पुणे शहराला वाढीव पाणी मिळावे यासाठी खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. मात्र, धरणग्रस्तांनीत्याला विरोध केला आहे. धरणग्रस्तांच्या विविध मागण्या व प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्या मागण्या पूर्ण झाल्यावरच कामसुरू करा, यासाठी धरणग्रस्तांनी आंदोलन उभारलेले होते. तेव्हापासून हे काम बंद होते.सुमारे १४ वर्षांपासून भामा-आसखेड धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धरण प्रशासन व शासन यांचे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. ‘आधी पुनर्वसन, मग प्रकल्प’ असे फक्त आश्वासन देऊन धरणग्रस्तांची फसवणूक झाली असल्याची भावना आहे. त्यामुळे तेव्हापासून संतप्त शेतकºयांनी पुण्याला नेण्यात येणाºया पाणी योजनेच्या पाइपलाइनचे काम व जॅकवेलचे काम वेळोवेळी बंद पाडले. धरणग्रस्तांनी जॅकवेलचे कामच बंद पाडले. आज ४ पोलीस निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, २०० कॉन्स्टेबल अशी मोठी फौज लावून पूर्ण बंदोबस्तात जॅकवेलचे काम सुरू केले. सध्या तरी फक्त पाणी उपसण्याचे काम सुरु केले आहे.येत्या ८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी भामा-आसखेड विश्रामगृहात प्रलंबित प्रश्नांची किती पूर्तता झाली व काय परिस्थिती यासाठी येणार आहे, या सगळ्या बाबींमुळे काम सुरू झाले तरी आंदोलक (बाधित शेतकरी) कोणीही फिरकले नाही. गरज पडलीच, तर पुनर्वसन समितीचे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची दिशा ठरेल.- सुरेश गोरे, (आमदार )येत्या दोन-तीन महिन्यांत सगळे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काम सुरू झाले असले, तरी तसे न झाल्यास गावोगाव सभा घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.- किसन नवले (बाधित शेतकरी)