शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या नुकसानीचे ‘अग्निकांड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST

लष्कर- शहरातील प्रसिद्ध कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती. शनिवारी पहाटे पाचपर्यंत ही आग ...

लष्कर- शहरातील प्रसिद्ध कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती. शनिवारी पहाटे पाचपर्यंत ही आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला. या आगीत पाचशेहून अधिक दुकानांची राख झाली असून, कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

आग लागल्यानंतर रात्री अग्निशमन दलाचे बंब, महापालिका, कॅन्टोन्मेंटचे बंब आणि वॉटर टँकरद्वारे विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत दुकानांमधील सर्व माल जळून खाक झाला आहे.

फॅशन स्ट्रीट हे व्यापारी संकुल एम. जी. रोड व ईस्ट स्ट्रीट रोडच्या दरम्यान जवळपास दोन एकर परिसरात अतिशय दाटीवाटीने वसलेले आहे. संपूर्ण फॅशन मार्केटमध्ये पाचशेहून अधिक दुकाने आहेत. त्यामध्ये कपडे, पादत्राणे आणि इतर साहित्याचे दुकाने आहेत. पत्र्यांनी बांधलेली आणि एकमेकांना चिटकून असलेले हे मार्केट आहे. त्यामुळेच आग मोठ्या प्रमाणावर पसरली.

एम. जी. रोडवरील व्यापारी दुकानांसमोरच्या पदपथावर १९९७ पूर्वी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन येथील दुकानदार यांच्या विरोधामुळे, वाहतुकीच्या अडचणीमुळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाने १९९७ साली व्यावसायिकांना ‘कांबळे मैदान’ म्हणजेच आताचे फॅशन स्ट्रीट मार्केटला हलविले होते.

या ठिकाणी केवळ १ वर्षाच्या करारावर ४ बाय ५ म्हणजे २० चौरस फूट इतका ओटा दिला होता. त्यावेळी विक्रेत्यांची संख्या ४७१ एवढी होती. २००६ साली त्यात १२१ गाळे वाढवण्यात आले. परंतु आज येथील पार्किंगमध्ये देखील गाळे बसविल्याने त्याची संख्या हजाराच्या जवळपास आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ८ या वेळेत व्यवसाय करून प्रत्येकाने आपला माल घरी घेऊन जायचा, असा नियम केलेला आहे. बोर्ड व्यावसायिकांकडून २ ते ५ रुपये इतके भाडे डॅमेज चार्ज म्हणून घेत.

----------------

फॅशन स्ट्रीट धोकादायक असल्याचा अहवाल

२०१७ साली मुंबई येथील कमला मिल जळीतकांड नंतर २०१८ साली बोर्डाने पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या फायर ब्रिगेड संयुक्तरित्या फॅशन मार्केटचे फायर ऑडिट करायला सांगितलं होते. त्या वेळी या तिन्ही फायर ब्रिगेडने धोकादायक व्यापारी संकुल म्हणून या फॅशन स्ट्रीटचा अहवाल दिला होता. बोर्डाने तो अहवाल नंतर जाहीर केला होता. पण त्या अहवालावर बोर्डाने काहीच कार्यवाही केली नाही.

--------------