शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST

लोकमत न्युज नेटवर्क खोडद : जुन्नर तालुक्यात गुरूवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ...

लोकमत न्युज नेटवर्क

खोडद : जुन्नर तालुक्यात गुरूवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हलक्या स्वरूपाचा पडणारा पावसाचा जोर रात्री ९. ३० च्या दरम्यान अचानक वाढला आणि मुसळधार पावसात रूपांतर झाले. काढणीला आलेली द्राक्ष अवकाळी पावसामुळे विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे मातीमोल होणार असल्याने द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहेत. या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हिवरे तर्फे नारायणगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी किरण भोर यांनी सांगितले की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे २०२० हे वर्ष अत्यंत वाईट गेले आहे. त्यात निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही. जुन्नर तालुक्यात चालू वर्षी शेतकऱ्यांनी सुमारे २ हजार एकर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेतले आहे. यामध्ये ब्लॅक जम्बो जातीची द्राक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच शरद सीडलेस,थॉमसन, आर. के.सोनाका या जातींची देखील द्राक्ष मोठया प्रमाणात आहेत. तालुक्यातील ही द्राक्ष सध्या १०० दिवसांची झाली आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. अनेक बागांमध्ये द्राक्ष घडांमध्ये ५० टक्के पाणी उतरले आहे. मात्र, गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान होणार आहे.

गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे द्राक्ष मण्यांना आतून व बाहेरून देखील तडे जाणार आहेत. मण्यांना गेलेल्या तड्यांमध्ये डावणी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठा आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने हा माल निर्यातक्षम राहणार नसून याचे मनुखे देखील तयार होणार नाही. एवढे मोठे नुकसान या अवकाळी पावसामुळे होणार आहे.

चौकट

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागणार नाही. द्राक्षांसोबतच पपई, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील या अवकाळी पावसामुळे आर्थिक फटका बसणार आहे.

विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ही द्राक्षे निर्यात करण्यायोग्य राहणार नसल्याने नुकसान होण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. यावर्षी द्राक्षांचे केवळ ५० टक्केच उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.

चौकट

मागील वर्षी झालेला सततचा पाऊस आणि वातावरणात होणारे सततचे बदल यामुळे मागचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. शासनाने जुन्नर तालुक्यातील द्राक्षांच्या बागांचे पंचनामे तातडीने करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना वेळीच भरीव व तातडीने आर्थिक मदत केली नाही तर मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ आपल्या शेतकऱ्यांवर येईल.

-माऊली खंडागळे शिवसेना तालुका प्रमुख, जुन्नर ================================ कॅप्शन : गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या घडांमध्ये पाणी साठले होते.हिवरे तर्फे नारायणगाव येथील किरण भोर यांच्या द्राक्ष बागेतील हे छायाचित्र.