शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

डिंभे कालव्याला मोठी गळती

By admin | Updated: February 14, 2015 00:09 IST

काही ठिकाणी ऐन उन्हाळयाच्या दिवसांत धबधबे वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जमिनीत दलदल निर्माण झाली आहे.

डिंंभे : डिंभे धरणाच्या कालव्यातील गळतीमुळे दररोज हजारो-लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदिवासी भाग पाण्यासाठी वणवण करीत असताना धरणाच्या खालच्या भागात डोंगरांना पाझर फुटले आहेत. धबधबे वाहू लागले असून, सततच्या दलदलीमुळे जमिनीही नापीक झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. ही गळती कधी थांबणार, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.धरणातून सध्या दुसरे आवर्तन सुरू आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दररोज ७५० क्युसेक्सच्या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. डावा व उजवा कालवा हे या धरणाच्या दोन जलवाहिन्या आहेत. दर वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये या कालव्यांतून हजारो लिटर पाणी वाया जाते. धरणापासून निघालेल्या मुख्य कालव्याचे पुढे दोन भागांत रूपांतर होत असून, गावच्या पुढे जंपिंग कालवा तयार करण्यात आला आहे. सुमारे दोन कि.मी. निर्माण झालेल्या या कालव्यातून अनेक ठिकाणी गळती होत आहे. ही गळती कायम राहिल्यास भविष्यात या कालव्यास धोका निर्माण होऊ शकतो. कॅनॉलपासून निघालेला उजवा कालवाही अनेक ठिकाणी गळत असल्याने धरणाच्या खालच्या भागात डोंगरांना पाझर फुटले आहेत. काही ठिकाणी ऐन उन्हाळयाच्या दिवसांत धबधबे वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जमिनीत दलदल निर्माण झाली आहे. उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.(वार्ताहर)